Sunday, July 24, 2016

ढोंगी दलितवाद

तथाकथित विज्ञानवादी, बुध्दीवादी, विवेकवादी विचारवंत (म्हणजेच काय तर झम्डु बामसेफी, ब्रिगेडी बांडगुळं ,फुरोगामी) पुरोगामीत्वाचा, विज्ञानाचा बुरखा ओढुन हे ढोंगी खरतर बहुसंख्यांची फसवणुक करीतह आहेत. यांना पाच हजार वर्षांची पिळवणुक दिसते, व सतत सतत त्या पिलवणुकीचे भांडवल करीत दलित साहीत्य काय,दलित सम्मेलन, दलित सिनेमा काय, दलित चित्रकला काय,,,,,नाही नाही ते प्रकार क्करुन दलितांचे दलितपण टिकवुन ठेवले आहे. आज जर आपण हे मान्य जरी केले की हजारो वर्षे एका विषीश्ट वर्गावर अन्याय झाला होता, व समानतेची वागणुक दिली गेली नाही, तरी दुसरीकडे गेल्या ७० वर्षातल हे वास्तव ह्या बेंडसाळांना का दिसत नाही की ह्याच भारयीत समाजाने, संविधान शिरसावंद्य मानीत, समरसते ची स्थापना केली. हो हाच तो भारतीय समाज आहे ज्याने संविधानाला डोक्यावर घेतल व कालसंगत परीवर्तन आत्मसात केल. कदाचित हजार वर्षात जेवढ्या अन्यायाच्या घटना झाल्या असतील त्यापेक्षा एक टक्का तरी कमी झाल्यात की नाही? जर झाल्या असतील तर त्याचे श्रेय जाते ते इथल्या परीवर्तन शील व विकसनवादी समाजमनाला. बाबासाहेबांनी दलि*आचा दलितपणा घालवण्यासाठी आयुष्य घालवले आणी ही बेंडसाळं त्याच बाबासाहेबांचे नाव घेऊन घेउन दलितपणा जीवंत ठेवीतात.(खरतर दलित हा शब्द वापरणे म्हणजे अवघड जातय, नकोस वाटतय, पण इलाज नाही)..
दलित साहित्य काय, दलित चळवळ काय, अरे काय हा वेडेपणा? जातीव्यवस्थेचे निर्मुलन करायचे ना? मग ह्या शब्दाने सुरु होणा-या सगळ्या चळवळी बंद करा. संघाचे मला या बाबतीत पटते, संघाच्या शब्दकोषात हा शब्दच नाही. तरी ही संघ जातीयवादी, मनुवादी. मनुवादी म्हणुन हिन्दुंची अवहेलना करण्याचा केविलवाणा प्रयत्न करणा-या या बेंडसाळांनी पहिल्यांदा "दलि*" हा शब्द वापरणे बंद केले तर त्यांच्या पुरोगामीत्वाची थोडी तरी प्रचीती येईल.

Wednesday, July 13, 2016

मेलेल्याच्या टाळुवरचे लोणी खाणारे ख्रिश्चन मिशनरी..

मेलेल्याच्या टाळुवरचे लोणी खाणारे ख्रिश्चन मिशनरी..

काल ससुन हॉस्पीटल मध्ये गेलो होतो. सरकारी , गोरगरीबांचा दवाखाना. लांब लांब गावा वस्त्यातुन लोक तिथे उपचारासाठी येत असतात, तसेच पेशंट्चे नातेवाईक सुध्दा व्हरांड्यांत, जागा मिळेल तिथे बस्तान मांडतात, ह्या व अशा अनेक कारणामुळे तिथे गर्दी व अस्वच्छता वाढलेली आहे. मी ज्या उपचारांकरीता गेलो होतो, ते व्यवस्थित झाले. अत्याधुनिक तंत्रज्ञान व काळजीवाहु कर्मचारी सेवक व डॉक्टर्स आहेत.
एक अत्यंत वाईट बाब तिथे ही निदर्शनास आली. व्हरांड्यात बसलेल्या सर्वच्या सर्व माणसांकडे "नवा करार" नावाचे , नवे कोरे पुस्तक दिसले. उत्सुकतेपोटी मी एका मावशींना विचारले हे काय तर त्या म्हणाल्या "आजार घालवण्यासाठी एका मॅडम ने हे पुस्तक वाचायला सांगितले व जमल्यास शेजारच्या एका मंदीरात यायला सांगितले. मॅडम कुठे आहे हे मी विचारले, त्यांना सांगता नाही आले. मी शोधाशोध केली पण कुणी सापड्ले नाही.
पण ख्रिश्चन गिधाड म्हणजेच मिशनरी लोक किती खालच्या स्तरावर जाऊन धर्मांतराचे काम करीतात हे पुन्हा एकदा दिसले.

Wednesday, July 6, 2016

प्रासंगिक - गोरक्षक आणि बुध्दीवादी

प्रासंगिक - गोरक्षक आणि बुध्दीवादी
आजच टीव्ही वर सकाळी सकाळी बातम्या पाहताना एक बातमी सांगितली गेली. भारतात एक संस्था आहे, प्राणी प्रेमी संंस्था. या संस्थेने न्यायालयात एक याचिका दाखल केली की पाळीव कुत्र्यांच्या संगोपनासाठी नियमावली तयार करुन कुत्रे पाळणा-या माणसांवर ते नियम पाळणे बंधनकारक करण्यासाठी, व न्यायालयाचे तसा आदेश ही काढला.
हे एवढ्या साठी सांगतोय की अशा प्रकारे कुत्र्या मांजरांसाठी काम करणा-या संस्थे विषयी साहजिकच आपल्या मनात एक कौतुकाची भावना येते, त्यात काम करणारे लोक किती दयाळु, कनवाळु आहेत व ते खरोखर मनुष्य म्हणुन घेण्यास पात्र आहेत असे वाटते.
आता विरोधाभास पहा, गाय, बैल यांची कत्तल होऊ नये म्हणुन काम करणारे मात्र याच देशात तथाकथित बुध्दीवाद्यांकडुन, धर्मनिरपेक्षतावाद्याकंडुन "टिकेस" पात्र होतात...आहेना गम्मत?

प्रासंगिक - इस्लाम व आतंक एक चिकित्सा

प्रासंगिक - इस्लाम व आतंक एक चिकित्सा

गेल्या ८-१० दिवसात इस्लामी दहशतवाद्यांनी ४-५ मोठे मोठे हल्ले जगभरात केलेत.
त्याच्यावर हिंदुत्व-हिंदुत्ववादी-संघी-ब्राम्हण्यवादी-पेठी इत्यादी इत्यादी शब्द सर्रास वापरणाऱ्या तथाकथित पुरोगामित्वाचा बुरखा घातलेल्या मुस्लिमांची प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहे ..
*त्यांना खरा इस्लाम कळला नाही.
*इस्लाम हे शिकवत नाही.
*कुराण असे शिकवत नाही.
*कुराणाने असे कधीच सांगितले नाही.
*पैगंबराने असे कधी सांगितले नाही.
*इस्लाम हा शांततेचा श्रम आहे.
*इस्लाम हा पैगंबराने जगाला दिलेली देणगी आहे.
*त्यांचा हा इस्लाम असेल तर हा इस्लाम आमचा नाही.
*हे त्यांचे राजकारण आहे.
इत्यादी इत्यादी ..
तर जगभरात लफडे करणाऱ्या सगळ्याच इस्लामी दहशतवाद्यांचे म्हणणे असते कि ..
*हाच खरा इस्लाम.
*इस्लाम हेच शिकवतो.
*कुराणात हेच लिहिले आहे.
*कुराण हेच सांगते.
*इतरांना कुराण समजलेच नाही.
*पैगंबरांनी हेच केले आहे.
*इस्लाम हा जगावर राज्य करण्यासाठी आला आहे.
*आमचा इस्लाम हाच खरा इस्लाम.
*आमचा धर्म आणि राजकारण हेच आहे.
____*____*____*____*____*___*____
काय आहे ना, ह्या दोन्ही बाजू याला खरा इस्लाम-कुराण समजल नाही - त्याला खरा इस्लाम-कुराण समजल नाही अस एकमेकांबद्दल बोलून जगाला मुर्खात काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
जर इतक्या वर्षात कोणालाच इस्लाम-कुराण समजल नसेल तर मग ते ठेवलय कशाला? कोणाला मुर्खात काढत आहेत हे दोन्ही गट ..
आहात ना पुरोगामी ? मग नाकारा इस्लाम-कुराण .. आहे तयारी ? ..
करा इस्लामची-कुराणाची-पैगंबराच्या आयुष्याची चिकित्सा ? आहे तयारी ? ..
गैरमुस्लिमांच्या टोळ्यांवर हल्ले, त्यातील पुरुषांची गळा चिरून हत्या करणे, त्यामधील स्त्रियांना गुलाम बनवून सेक्ससाठी आपल्या मुलांना देणे-त्यांना वाटले तर ते त्या स्त्रिया इतरांना विकू हि शकत होते ..इत्यादी गोष्टी तर पैगंबर असल्यापासून सुरु आहेत .
आता सांगा कि दहशतवादी कृत्य आणि इस्लाम वेगळे कसे ?
ब्राम्हण्य-हिंदुत्ववादी-संघी-मनुवादी असे शब्द सर्रास वापरता ना ? मग आता वापरा बर ह्या दहशतवाद्यांविरुद्ध कुराणवादी-पैगंबरवादी-हिरवे दहशतवादी असे शब्द वापरून टीका..
कधीतरी म्हणा कि इस्लाममध्ये-कुराणामध्ये-पैगंबराच्या आयुष्यात काही चुका आहेत, त्या आता काळानुरूप दुरुस्त केल्या पाहिजेत.आहे तयारी?
इस्लाम हि पैगंबराणे जगाला दिलेली देणगी आहे अस इस्लामचा स्थापनेपासूनचा इतिहास बघता म्हणावस तरी कस वाटत ?
इतर धर्मियांवर टीका करण्यापेक्षा - इतर धर्मांची चिकित्सा करण्यापेक्षा तेवढा वेळ आणि अभ्यास स्वताच्या धर्माला आणि धर्मबांधवांना दिला ना तर बर होईल ..
इस्लाम विरुद्ध इतर ..
बांगलादेशमध्ये मारल्या गेलेल्या २० लोकांमध्ये ९ इटालियन , सात जपानी, एक अमेरिकन, एक भारतीय म्हणजे एकूण १८ . मारल्या गेलेल्या २० मध्ये केवळ एक बांगलादेशी आहे आणि इतर सगळे विदेशी आहेत.
म्हणजे हि लढाई मुस्लीम विरुद्ध गैरमुस्लिम अशीच होती.इस्लामची लढाई कोणाबरोबर आहे हे तर स्पष्ट झाल.
हे असच सुरु राहील तर जगात इस्लामवर बंदी येईल आणि हि वेळ देखील फार लांब नाही .
बर्याच मुस्लीम विचारवंतांचे म्हणणे असते कि इस्लामी आतंकवादाचे सगळ्यात जास्त बळी मुसलमानच आहेत. नक्कीच त्याचं खर आहे. तरी सुद्धा कुराणा विरुद्ध न बोलन , इस्लामिक शिक्षनाविरुद्ध न बोलन , त्यामधील चुका दुरुस्त करण्याबद्दल न बोलन काय सांगत ? इस्लाममध्ये मुलभूत चुका आहेत हेच मान्य करायचं नाही - त्या सुधारण्याचा प्रयत्न करायचा नाही आणि आतंकवादाविरुद्ध बोलायचं ? .. ज्या दिवशी हे सुरु कराल त्या दिवशी दहशतवाद संपायला खरी सुरुवात होईल ..

Wednesday, May 25, 2016

महान भारत - होता, आहे व असेल ही..

महान भारत - होता, आहे व असेल ही..
#IndianAchievements
भारताचा भुतकाळ वैभवशाली होता हे म्हणण्यासाठी आपणास रामायण, महाभारत, वेद, उपनिषदे, पुराणे यांचे दाखले देण्याची गरज नाही. अगदी सतराव्या अठराव्या शतकापर्यन्त भारत विविध क्षेत्रात जगभरात अग्रेसर होता. बुध्दीप्रामाण्याची कास धरणा-यांनी, सप्तरंगांच्या दुनियेचे पाईक , विवेकवादी, नास्तिक आदी लोकांना ही भारताविषयी अभिमान वाटेल असा आपला भुतकाळ होता. जे देशभक्त आहेत खरतर त्यांना ह्या अशा दाखल्यांची गरज नाही, पण आपली देशभक्ती ही या देशात जन्माला आल्यामुळेच निर्माण झालेली असेल तर त्या देशभक्तांनी सुध्दा "पोकळ देशभक्तीच्या" गप्पा मारण्यापेक्षा वाचन केले व "भारत खरच महान होता" हे जाणुन घेऊन भारताचे महानत्व पुढे नतमस्तक झाले तर "सोने पे सुहागा" होउन जाईल.

श्री धरमपाल हे महात्मा गांधीजींचे निकटवर्तीय व अनुयायी. गांधींजीच्या सांगण्यावरुन त्यांनी ब्रिटीश रेकॉर्डस चे अनुशीलन सतत २० वर्षे केले. या अभ्यासामध्ये त्यांनी तात्कालिन ब्रिटीश इस्ट ईम्डीया कंपनीचा ब्रिटीश संसदेशी, सांसदांशी, शासनाशी झालेला पत्र व्यवहार, विविध रीपोर्ट्स, भारतातील ब्रिटीश अधिका-यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी झालेला पत्रव्यवहार, तसेच विविध अहवाल यांचा समावेश आहे. हे सर्व करण्यासाठी त्यांनी ब्रिटीश संग्रहालये, अर्काईव्ह्स यांचा सखोल व निरंतर अभ्यास केला. त्यांच्या अभ्यासाचा मुळ हेतु ब्रिटीश पुर्व काळातील भारतातील विज्ञान, तंत्रज्ञान, औद्योगिकीकरण, शैक्षणिक स्थितीचा धांडोळा घेणे हा होता. त्यांनी केलेल्या अभ्यासाचा परीपाक "द ब्युटीफुल ट्री" या नावाने प्रसिध्द केला गेला. यात एकुण पाच भाग आहेत.जिज्ञासुंसाठी या प्रबंधाची लिंक देत आहे.

http://www.arvindguptatoys.com/arvindgupta/beautifultree.pdf


Saturday, May 7, 2016

डोंगराला आग लागली

डोंगराला आग लागली

वणवा लागण किंवा लावण म्हणजे एक महाभयंकर अपराध आहे. ही भुमाता जिच्या पोटी आपण जन्म घेतला, तिची मनुष्याव्यतिरिक्त ही अनेक संताने आहेत. की आपले बंधु आहेत. म्हणजे वृक्ष, वेली, प्राणी,सरपटणारे प्राणी, किडे, मुंग्या, असे असंख्य जीव या भुमातेच्या अंगा खांद्यावर खेळत, बागडत असतात. त्याचप्बरोबर हे असंख्य जीव आपले निसर्गचक्र नीट राखण्याचे काम ही माणसापेक्षा जास्त चांगल्या पध्दतीने करीत असतात. मग माणुस का निसर्गचक्रामध्ये हस्तक्षेप करीत आहे. डोंगराला आग लावल्यामुले आपण आपल्याच पायावर कु-हाड मारीत आहोत. दरवर्षीच्या पावसाळ्यात उगवलेली लाखो रोपे माणसाच्या "वणवा" लावण्याच्या अविचारामुळे होरपळुन मरतात. परीणामी झाडाची संख्या वाढत नाही, हिरवे छत्र लुप्त होत आहे. दरवर्षी काही पर्यावरण प्रेमी मंडळी मोठ्या उत्साहाने वृक्षारोपणाचा कार्यक्रमा करतात. पण ह्या वणव्याम्मुळे जेवढी झाडे लावली जातात त्याच्यापेक्षा हजारपट जास्त झाडे मरतात. निसर्ग स्वतःची काळजी घेण्यासाठी सक्षम आहे, माणसाने फक्त वणवा लावण्यासारख्या गोष्टींपासुन स्वतःला परावृत्त करणे गरजेचे आहे.

आग लावणा-या माणसांकडे फेसबुक नसते, व्हॉट्सऍप नसते, ऍम्ड्रॉईड फोन नसतो, त्यामुळे तुमच्या माझ्या सारख्यांचे (म्हणजेच हा संदेश वाचणा-यांचे) काम आहे की आपाअपल्या गावात अशा प्रत्येक व्यक्ति पर्यत हा संदेश तोंडी पोहोचवावा, शेतकरी, गुराखी,कातकरी,आदी लोकांना याबाबत जागरुक करणे गरचे आहे. कारण ते लोक आपल्या पेक्षा जास्त जवळ असतात निसर्गाच्या कुशीत असतात, त्यामुळे जसे वृक्ष वेली, प्राणीमात्राम्चे सर्वाधिक नुकसान होते, तसेच शेतकरी, गुराखी, आदीवासी बांधवांचे देखील खुप नुकसान होते, व संपुर्ण पर्यावरणाचे होणारे नुकसान तर सगळ्या चराचर, प्राणीमात्रांना , इकोसिस्टमला भोगावे लागते आहे.

Friday, May 6, 2016

जातिव्यवस्था निर्मुलनातील एक अडसर - दलितपण

सेय नो टु कास्ट


अजुन किती दशके त्याच विटाळ कथा घेऊन बसणार. मान्य आहे विशिष्ट वर्गाबरोबर असा पक्षपात झाला, पण सर्व समाज, समाजाची आधारशीला, जे की संविधान आहे, ते संविधान, समाजातील बराच मोठ वर्ग ज्यांचे पुर्वजांनी भुतकाळात एका वर्गास अन्यायकारक, प्रसंगी अमानवीय वागणुक दिली होती.., तर ज्यांनी ही वागणुक दिली त्यांचे वंशजांनी (जैववैद्यक , निसर्गदत्त व सांस्कृतिक वारस) हे मान्य केले आहे की भुतकाळात जे झाले ते चुकिचे होते...व तसे आता ही होत असेल तर ते ही चुकीचे आहे...या व अश अन्य अनेक कारणांमुळे जर भारतीयांचे मग ते पंथाने काही ही असो, जर धर्मांतर होत असेल तर हे धर्मांतर चुकीचे नाही असे का आपणास म्हणायचे आहे. पीडा देणा-यांच्या वंशजांनी चुक मान्य केली तसे असुनही पुरेसे नसेल तर नक्की अपेक्षा तरी काय आहे? ज्यांनी अन्याय केले त्यांच्यांवर नरकात जाऊन खटले भरायचे की जे दिलगीर(वंशज) आहेत त्यांच्याशी गळा भेट करुन पुन्हा एक व्हायचे, व मातृभुची सेवा करायची?...मला अजुन ही "दलित" हा शब्द वापरायचा किंवा उच्चारायचा किंवा लिहायचा म्हंटले तरी नकोसे होते, कारण या शब्दासच आपण आपल्या डिक्शनरीमधुन काढुन टाकले तरच "दलितत्व" सुध्दा संपुष्टात येईल. पण जेवढी ही जबाबदारी दलितेतर लोकांची आहे तेवढीच ज्यांच्यांवर अन्याय झाला त्यांची ही नाही का? किती वर्षे आपण आपले दलितत्व सांभाळणार आहोत? बाबासाहेबांना हे दलितत्वच तर घालवायचे होते, व आज त्यांचेच काही(सगळे नाही) अनुयायी अजुनही तोच शिक्का स्वतःच्या कपाळी मारुन मढे उकरण्याचे काम अविरत करीत आहेत. आपल्या समाजातातील दोषांमुळे(ते ही भुतकाळातील) आपण जर ख्रिश्चन मिशन-यांचे षडयंत्रास पाठिंबा देत असु तर आपण आत्म परीक्षण करणे गरजेचे आहे.. तसेही मंगेश मुरुडकरांनी म्हंटल्याप्रमाणे ते उपाय गेली ८० वर्षे संघ अविरत पणे करीत आहे. संघात जात ,धर्म नाही. इथे फक्त हिन्दु आहेत..असे सर्व लोक जे स्वतःला सांस्कृतिक दृष्टा हिन्दु मानतात ते सर्व इथे आहेत, त्यात मुस्लीम ही आहेत, बौध्द आहेत, व ख्रिश्चन ही आहेत...फक्त राजकीय हेतुंसाठी व एक गठ्ठा मतदानसाठी तथाकथित दलित नेते अजुनही "दलितत्व" जीवंत ठेवीत आहेत...