Wednesday, July 6, 2016

प्रासंगिक - इस्लाम व आतंक एक चिकित्सा

प्रासंगिक - इस्लाम व आतंक एक चिकित्सा

गेल्या ८-१० दिवसात इस्लामी दहशतवाद्यांनी ४-५ मोठे मोठे हल्ले जगभरात केलेत.
त्याच्यावर हिंदुत्व-हिंदुत्ववादी-संघी-ब्राम्हण्यवादी-पेठी इत्यादी इत्यादी शब्द सर्रास वापरणाऱ्या तथाकथित पुरोगामित्वाचा बुरखा घातलेल्या मुस्लिमांची प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहे ..
*त्यांना खरा इस्लाम कळला नाही.
*इस्लाम हे शिकवत नाही.
*कुराण असे शिकवत नाही.
*कुराणाने असे कधीच सांगितले नाही.
*पैगंबराने असे कधी सांगितले नाही.
*इस्लाम हा शांततेचा श्रम आहे.
*इस्लाम हा पैगंबराने जगाला दिलेली देणगी आहे.
*त्यांचा हा इस्लाम असेल तर हा इस्लाम आमचा नाही.
*हे त्यांचे राजकारण आहे.
इत्यादी इत्यादी ..
तर जगभरात लफडे करणाऱ्या सगळ्याच इस्लामी दहशतवाद्यांचे म्हणणे असते कि ..
*हाच खरा इस्लाम.
*इस्लाम हेच शिकवतो.
*कुराणात हेच लिहिले आहे.
*कुराण हेच सांगते.
*इतरांना कुराण समजलेच नाही.
*पैगंबरांनी हेच केले आहे.
*इस्लाम हा जगावर राज्य करण्यासाठी आला आहे.
*आमचा इस्लाम हाच खरा इस्लाम.
*आमचा धर्म आणि राजकारण हेच आहे.
____*____*____*____*____*___*____
काय आहे ना, ह्या दोन्ही बाजू याला खरा इस्लाम-कुराण समजल नाही - त्याला खरा इस्लाम-कुराण समजल नाही अस एकमेकांबद्दल बोलून जगाला मुर्खात काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
जर इतक्या वर्षात कोणालाच इस्लाम-कुराण समजल नसेल तर मग ते ठेवलय कशाला? कोणाला मुर्खात काढत आहेत हे दोन्ही गट ..
आहात ना पुरोगामी ? मग नाकारा इस्लाम-कुराण .. आहे तयारी ? ..
करा इस्लामची-कुराणाची-पैगंबराच्या आयुष्याची चिकित्सा ? आहे तयारी ? ..
गैरमुस्लिमांच्या टोळ्यांवर हल्ले, त्यातील पुरुषांची गळा चिरून हत्या करणे, त्यामधील स्त्रियांना गुलाम बनवून सेक्ससाठी आपल्या मुलांना देणे-त्यांना वाटले तर ते त्या स्त्रिया इतरांना विकू हि शकत होते ..इत्यादी गोष्टी तर पैगंबर असल्यापासून सुरु आहेत .
आता सांगा कि दहशतवादी कृत्य आणि इस्लाम वेगळे कसे ?
ब्राम्हण्य-हिंदुत्ववादी-संघी-मनुवादी असे शब्द सर्रास वापरता ना ? मग आता वापरा बर ह्या दहशतवाद्यांविरुद्ध कुराणवादी-पैगंबरवादी-हिरवे दहशतवादी असे शब्द वापरून टीका..
कधीतरी म्हणा कि इस्लाममध्ये-कुराणामध्ये-पैगंबराच्या आयुष्यात काही चुका आहेत, त्या आता काळानुरूप दुरुस्त केल्या पाहिजेत.आहे तयारी?
इस्लाम हि पैगंबराणे जगाला दिलेली देणगी आहे अस इस्लामचा स्थापनेपासूनचा इतिहास बघता म्हणावस तरी कस वाटत ?
इतर धर्मियांवर टीका करण्यापेक्षा - इतर धर्मांची चिकित्सा करण्यापेक्षा तेवढा वेळ आणि अभ्यास स्वताच्या धर्माला आणि धर्मबांधवांना दिला ना तर बर होईल ..
इस्लाम विरुद्ध इतर ..
बांगलादेशमध्ये मारल्या गेलेल्या २० लोकांमध्ये ९ इटालियन , सात जपानी, एक अमेरिकन, एक भारतीय म्हणजे एकूण १८ . मारल्या गेलेल्या २० मध्ये केवळ एक बांगलादेशी आहे आणि इतर सगळे विदेशी आहेत.
म्हणजे हि लढाई मुस्लीम विरुद्ध गैरमुस्लिम अशीच होती.इस्लामची लढाई कोणाबरोबर आहे हे तर स्पष्ट झाल.
हे असच सुरु राहील तर जगात इस्लामवर बंदी येईल आणि हि वेळ देखील फार लांब नाही .
बर्याच मुस्लीम विचारवंतांचे म्हणणे असते कि इस्लामी आतंकवादाचे सगळ्यात जास्त बळी मुसलमानच आहेत. नक्कीच त्याचं खर आहे. तरी सुद्धा कुराणा विरुद्ध न बोलन , इस्लामिक शिक्षनाविरुद्ध न बोलन , त्यामधील चुका दुरुस्त करण्याबद्दल न बोलन काय सांगत ? इस्लाममध्ये मुलभूत चुका आहेत हेच मान्य करायचं नाही - त्या सुधारण्याचा प्रयत्न करायचा नाही आणि आतंकवादाविरुद्ध बोलायचं ? .. ज्या दिवशी हे सुरु कराल त्या दिवशी दहशतवाद संपायला खरी सुरुवात होईल ..

No comments:

Post a Comment