Wednesday, March 30, 2016

आर्यन इन्व्हेजन थेयरी चा खोटारडेपणा कधीच उघडा पडला आहे. या सिध्दांतामुळे आजपर्यन्त म्हणजे गेल्या जवळजवळ दोन शतकात भारताचे बरेच नुकसान केले व आजही आधुनिक भारताचे तुकडे करण्याचे काम हा सिध्दांत करीत आहे. आर्य भारतात बाहेरुन आले असे दोनशे वर्षापुर्वी म्हणताना ,ब्रिटीश वसाहतवाद्यांनी हे देखील म्हंटले होते की भारतात आलेले आर्य हे दुय्यम दर्जाचे किंवा वर्णमिश्रीत आर्य आहेत, तर अस्सल आर्य युरोपातच आहेत. त्यातुनच पुढे जर्मनी मध्ये कपोलकल्पित आर्य वंशाचा वृथा अभिमान जन्मास येऊन ,लाखो ज्युं च्या कत्तली झाल्या, युरोप ने दिडशे वर्षे भारत, आफ्रिका आदी देशांना लुटुन जे कमावले होते त्या सर्वांची होळी झाली. याला कारणीभुत होता हा " आर्य सिध्दांत" यानंतरच युरोप ने आर्य सिध्दांताला तिलांजली दिली....त्याचप्रमाणे, श्रीलंकेमध्ये झालेली यादवी(तमीळ विरुध्द सिंहली) सुध्दा याच खोट्या आर्य सिध्दांताचे फलित आहे. ज्या आर्य थेयरीला जन्म देणा-या युरोपाने नाकारले, विविध भारतीय अभ्यासकांनी सप्रमाण हे सिध्द केले की "आर्य" नावाची जाती, किंवा पंथ, किंवा वंश कधी ही अस्तित्वात नव्हते, त्याच "आर्यन इन्व्हेजन थेयरी" ला भारतातीलच काही लोक, विशेषतः कम्युनिस्ट, लेफ्टीस्ट, सोशलिस्ट, ब्रिगेडी, तथाकथित दलित चळवळीचे पुरस्कर्ते अजुन कवटाळुन बसले आहेत. भारतातील या विविध डाव्या विचारधारा फक्त आणि फक्त एका सिध्दांतावर लक्ष केंद्रीत करुन भारतात क्रांती(?) घडवुन आणण्याचे स्पप्न पाहत आहेत, पण ते त्यांच्या माकडचाळ्यांमध्ये इतके गुंतुन गेलेत की ही "आर्यन इन्व्हेजन थेयरी" च चुकीची आहे, हे सप्रमाण सिध्द झालेले त्यांना पचत नाही की पचवुन घ्यायचे नाही. म्हणुनच हे अजुनही "मुल निवासी" सारख्या ब्रिटीशांनी जन्माला घातलेल्या शब्दांचा उपयोग करुन भारतीयांस बहकवण्याचे काम करीत आहेत.

Monday, March 21, 2016

एक फसवणुक - तेरेसा

एक फसवणुक - तेरेसा

एक स्त्री, जिने स्वत;च्या देशा तील भुखमरी, गरीबी, रोगपीडीत लोक सोडुन परक्या देशात जाऊन सेवा केली, हि सेवा करताना लाखोंच्या संख्येने पीडीतांचे हाल हाल केले, त्यांचे धर्म परीवर्तन केले, कधी सेवेच्या नावखाली तर कधी पैश्याच्या आमिषाने लोकांच्या श्रध्देचा बळी घेतला. सेवा हे फक्त लेबल होते मुळ हेतु धर्म परीवर्तनाचा होता. ज्या ज्या लोकांची सेवा केली व मत परीवर्तन केले काय ते आज सर्वतोपरी दुःख यातना यापासुन मुक्त आहेत? त्यात ही चर्च ने या स्त्री ला "संतत्व " बहाल करण्याचे जाहीर केले. संतत्व जाहीर करण्यासाठी अशा पुराव्यांची आवश्यकता असते ज्यातुन हे सिध्द होईल की त्या व्यक्ति ने अलौकिक, लोकोत्तर असा चमत्कार केला आहे. व असा चमत्कार आधुनिक विज्ञानाला मान्य नाही, तरीही या स्त्री ला संत पणा मिळतोय...
भारतातील संतभुमीत, ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव, जनाबाई, चोखा मेळा, गोरा कुंभार, सावता माळी, रोहीदास, मुक्ताबाई यांच्या पंक्तीला आता ही बाई बसणार? आम्ही भारतीय माऊलींचे संतपण त्यांच्या सर्वात मोठ्या चमत्कारामुळे मानतो, तो चमत्कार म्हणजे "ज्ञानेश्वरी", तुकारामांचा चमत्कार म्हणजे गाथा, नामदेवाचे ही असेच आहे. आमच्या सा-या संतांनी सामाजिक समरसतेचा मंत्र दिला तो होता "राम कृष्ण हरी", सर्वांसाठी एकच मंत्र, एकच मार्ग. आपल्या संतांनी कधी दुस-या धर्माच्या लोकांना आपल्या धर्मात आनण्याचा प्रयत्न केला नाही. संत पण म्हणजे जर चमत्कार असेल तर, चर्च चे संत पण विज्ञानास व आम्हासही मान्य नाही, आणि जर या बाईच्या या चमत्कारांचा पुरावा खरच असेल तर, अंधश्रध्दा निर्मुलन समिती वाल्यांनी ताबडतोब या मृत स्त्री वर मरणोत्तर "जादु टोणा विरोधी " कायद्याअंतर्गत खटला का भरु नये?