Showing posts with label दलित चळवळ. Show all posts
Showing posts with label दलित चळवळ. Show all posts

Sunday, July 24, 2016

ढोंगी दलितवाद

तथाकथित विज्ञानवादी, बुध्दीवादी, विवेकवादी विचारवंत (म्हणजेच काय तर झम्डु बामसेफी, ब्रिगेडी बांडगुळं ,फुरोगामी) पुरोगामीत्वाचा, विज्ञानाचा बुरखा ओढुन हे ढोंगी खरतर बहुसंख्यांची फसवणुक करीतह आहेत. यांना पाच हजार वर्षांची पिळवणुक दिसते, व सतत सतत त्या पिलवणुकीचे भांडवल करीत दलित साहीत्य काय,दलित सम्मेलन, दलित सिनेमा काय, दलित चित्रकला काय,,,,,नाही नाही ते प्रकार क्करुन दलितांचे दलितपण टिकवुन ठेवले आहे. आज जर आपण हे मान्य जरी केले की हजारो वर्षे एका विषीश्ट वर्गावर अन्याय झाला होता, व समानतेची वागणुक दिली गेली नाही, तरी दुसरीकडे गेल्या ७० वर्षातल हे वास्तव ह्या बेंडसाळांना का दिसत नाही की ह्याच भारयीत समाजाने, संविधान शिरसावंद्य मानीत, समरसते ची स्थापना केली. हो हाच तो भारतीय समाज आहे ज्याने संविधानाला डोक्यावर घेतल व कालसंगत परीवर्तन आत्मसात केल. कदाचित हजार वर्षात जेवढ्या अन्यायाच्या घटना झाल्या असतील त्यापेक्षा एक टक्का तरी कमी झाल्यात की नाही? जर झाल्या असतील तर त्याचे श्रेय जाते ते इथल्या परीवर्तन शील व विकसनवादी समाजमनाला. बाबासाहेबांनी दलि*आचा दलितपणा घालवण्यासाठी आयुष्य घालवले आणी ही बेंडसाळं त्याच बाबासाहेबांचे नाव घेऊन घेउन दलितपणा जीवंत ठेवीतात.(खरतर दलित हा शब्द वापरणे म्हणजे अवघड जातय, नकोस वाटतय, पण इलाज नाही)..
दलित साहित्य काय, दलित चळवळ काय, अरे काय हा वेडेपणा? जातीव्यवस्थेचे निर्मुलन करायचे ना? मग ह्या शब्दाने सुरु होणा-या सगळ्या चळवळी बंद करा. संघाचे मला या बाबतीत पटते, संघाच्या शब्दकोषात हा शब्दच नाही. तरी ही संघ जातीयवादी, मनुवादी. मनुवादी म्हणुन हिन्दुंची अवहेलना करण्याचा केविलवाणा प्रयत्न करणा-या या बेंडसाळांनी पहिल्यांदा "दलि*" हा शब्द वापरणे बंद केले तर त्यांच्या पुरोगामीत्वाची थोडी तरी प्रचीती येईल.

Friday, May 6, 2016

जातिव्यवस्था निर्मुलनातील एक अडसर - दलितपण

सेय नो टु कास्ट


अजुन किती दशके त्याच विटाळ कथा घेऊन बसणार. मान्य आहे विशिष्ट वर्गाबरोबर असा पक्षपात झाला, पण सर्व समाज, समाजाची आधारशीला, जे की संविधान आहे, ते संविधान, समाजातील बराच मोठ वर्ग ज्यांचे पुर्वजांनी भुतकाळात एका वर्गास अन्यायकारक, प्रसंगी अमानवीय वागणुक दिली होती.., तर ज्यांनी ही वागणुक दिली त्यांचे वंशजांनी (जैववैद्यक , निसर्गदत्त व सांस्कृतिक वारस) हे मान्य केले आहे की भुतकाळात जे झाले ते चुकिचे होते...व तसे आता ही होत असेल तर ते ही चुकीचे आहे...या व अश अन्य अनेक कारणांमुळे जर भारतीयांचे मग ते पंथाने काही ही असो, जर धर्मांतर होत असेल तर हे धर्मांतर चुकीचे नाही असे का आपणास म्हणायचे आहे. पीडा देणा-यांच्या वंशजांनी चुक मान्य केली तसे असुनही पुरेसे नसेल तर नक्की अपेक्षा तरी काय आहे? ज्यांनी अन्याय केले त्यांच्यांवर नरकात जाऊन खटले भरायचे की जे दिलगीर(वंशज) आहेत त्यांच्याशी गळा भेट करुन पुन्हा एक व्हायचे, व मातृभुची सेवा करायची?...मला अजुन ही "दलित" हा शब्द वापरायचा किंवा उच्चारायचा किंवा लिहायचा म्हंटले तरी नकोसे होते, कारण या शब्दासच आपण आपल्या डिक्शनरीमधुन काढुन टाकले तरच "दलितत्व" सुध्दा संपुष्टात येईल. पण जेवढी ही जबाबदारी दलितेतर लोकांची आहे तेवढीच ज्यांच्यांवर अन्याय झाला त्यांची ही नाही का? किती वर्षे आपण आपले दलितत्व सांभाळणार आहोत? बाबासाहेबांना हे दलितत्वच तर घालवायचे होते, व आज त्यांचेच काही(सगळे नाही) अनुयायी अजुनही तोच शिक्का स्वतःच्या कपाळी मारुन मढे उकरण्याचे काम अविरत करीत आहेत. आपल्या समाजातातील दोषांमुळे(ते ही भुतकाळातील) आपण जर ख्रिश्चन मिशन-यांचे षडयंत्रास पाठिंबा देत असु तर आपण आत्म परीक्षण करणे गरजेचे आहे.. तसेही मंगेश मुरुडकरांनी म्हंटल्याप्रमाणे ते उपाय गेली ८० वर्षे संघ अविरत पणे करीत आहे. संघात जात ,धर्म नाही. इथे फक्त हिन्दु आहेत..असे सर्व लोक जे स्वतःला सांस्कृतिक दृष्टा हिन्दु मानतात ते सर्व इथे आहेत, त्यात मुस्लीम ही आहेत, बौध्द आहेत, व ख्रिश्चन ही आहेत...फक्त राजकीय हेतुंसाठी व एक गठ्ठा मतदानसाठी तथाकथित दलित नेते अजुनही "दलितत्व" जीवंत ठेवीत आहेत...