Friday, November 11, 2016

सिंहगड जर सिंहाची गुहा असेल तर तोरणा म्हणजे गरुडाचे घरटे आहे


"सिंहगड जर सिंहाची गुहा असेल तर तोरणा म्हणजे गरुडाचे घरटे आहे",

..ब्रिटीश वकील, जेम्स डगलस ने तोरण्याविषयी काढलेले उदगार 

परवा २१ वर्षांनी तोरण्यावर पुन्हा जाण्याची संधी मिळाली. २१ वर्षापुर्वी सपकाळ सर, आनंद पाळंदे काका, धावडे सर, घावरे सर, प्रमोद मांडे काका आदी जाणकार मंडळींसोबत वयाच्या १६ व्या वर्षी तोरण्यावर गेलो होतो. या ज्येष्ट लोकांसोबत आणखीही बसेच किल्ले , डोंगर द-या भटकण्याचे भाग्य मिळाले. यांनी नुसतेच किल्ले दाखवले नाहीत तर किल्ल्यांकडे पाहण्याचा एक दृष्टीकोन सुध्दा दिला.
पाळंदे काकांचे पुस्तकातील एका वाक्याने मनात कायचे घर केले आहे. निसर्गातुन चालताना पावलाच्या ठश्याशिवाय मागे काही ठेवु नका व सुखद आठवणी वाचुन काही नेऊ नका"
आपल्या ऐतिहासिक वास्तु म्हणजे आपली साम्स्कृतिक धरोहर आहेत. त्यांचे जतन झाले पाहीजे. त्यांचा अभ्यास झाला पाहीजे. नवनवीन पिढ्यांना या वारश्याविषयी नीट माहीती करुन दिली गेली पाहीजे. व आणखी महत्वाचे म्हणजे या वास्तुंविषयी गर्हनीय भाव जनलोकांत निर्माण केला पाहीजे. हे आणि असे ही बरेच संस्कार वरील मंडळींनी बोलुन नव्हे तर त्यांच्या कृतीतुन आमच्या सारख्या अनेकांच्या मनावर केले आहेत.

परवाच्या तोरणा भेटीत वरील "दुर्गसंस्काराचा" -हास होत असलेला प्रकर्षाने जाणवला. सलग तीन दिवस सुट्ट्या, वाहनांच्या सुविधा, इत्यादी गोष्टींमुळे किल्ले पाहणे हा संस्कार न राहता तो आता फक्त "सहल", "मजा" व विरंगुळा राहीलेला आहे असेच खेदाने म्हणावे लागते. काही गोष्टी जाणवल्या त्यावर जाणकारांनी, दुर्ग प्रेमींनी, दुर्ग संवर्धकांनी अवश्य चिंतन करावे...

आम्ही किल्यावर जाण्यासाठी निघालो खरे पण वेल्हे गावात, पोहोचल्यावर समजले की किल्याच्या अर्ध्याअधिक चढाईपर्यन्त डांबरी व कॉम्क्रीट चा रस्ता झाला आहे. असेच मुळशीतील घनगडावर देखील झाले आहे. अशाप्रकारे रस्ते करण्यामुळे अनेकांची सुविधा होते हे खरे पण श्रम कमी झाल्याने, ज्यांना इतिहासातील "ती" ला पहीली वेलांटी की दुसरी वेलांटी हे देखील माहीत नाही अशा अनेक हवश्या, गवश्या व नवश्यांना किल्ल्यावर पोहोचणे सुलभ झालेले आहे. ज्यांना निसर्ग शिष्टाचार, नेचर इटीकेट्स माहीत नाहीत अशा हजारो लोकांना सहज पणे इथे पोहोचता येते. किल्ले सर्वांनीच पहावेत, पण जर किल्ल्यांचे किल्लेपण , पावित्र्य जर अशा लोकांच्या येण्याने नष्ट होणार असेल तर अशा लोकांनी किल्ल्यावर न आलेलेच बरे. अगदी साध्या गोष्टींचे दुर्ग संस्कार, निसर्गसंस्कार यांवर झालेले नसतात हे या ट्रेक वेळी जाणवले.

उदा - किल्ला किंवा कोणताही डोंगरावर चढताना किंवा उतरताना आपले दोन्ही हात मोकळे असावयास हवेत. त्यामुळे नैसर्गिक रीत्या शरीराचे संतुलन होण्यास मदत होते. कित्येक लोक किल्ला चढताना किंवा उतरताना एका हातात पाण्याची बाटली व दुस-या हातात "जीव गेलेली काठी" घेऊन दिसले. ब-याच लोकांना मी समजावुन सांगण्याचा प्रयत्न केला पण माझ्यासारख्याचे ऐकेल तो धाडसी तरूण कसला, ह्या आविर्भावात हे लोक चढत किंवा उतरत होते. (त्यात तोरणा तर गरुडाचे घरटे आहे, पुण्यातील सर्वात उंच किल्ला व पर्वत सुध्दा)...

किल्ला चढताना एका हातात ज्या पाण्याने भरलेल्या प्लास्टीकच्या बाटल्या असतात त्या, बाटलीतील पाणी संपल्यावर वाटेवरच टाकणे, किंवा किल्ल्यावर कुठे ही टाकणे ही कृती इतकी सामान्य झाली आहे की लोक हे देखील विसरले आहेत की ही विकृती आहे. असेच प्लास्टीक पिशव्यांच्या बाबतीत. बिन्नीच्या दरवाज्याने आत जातान, देवळीतच पडलेला प्लास्टीकच्या बाटल्यांचा खच/ढिग च स्वागत करतो, त्यातच वर चढुन आलेला बहादराच्या हाती जर मोकळी बाटली असेल तर त्याला कुणीही न सांगता तो निर्लज्ज पणे तिथेच हातातील बाटली टाकुन मोकळा होतो. प्लास्टीक च्या पिशव्या, थर्माकोलच्या जेवणाच्या खरकाट्या पत्रवाळ्या, तंबाखुच्या मोकळ्या पुड्या, प्लास्टीकचे ग्लास...अरे काय हा कर्म दरीद्रीपणा. शिवाजी महाराजांच्या इतक्या महान ऐतिहासिक वारश्यास ह्या लोकांनी कचराकुंडी करुन टाकावे यास कर्मदरीद्री पणा नाही म्हणायचे तर आणखी काय?

किल्ला चढताना, किंवा उतरताना, अति उत्साहाच्या भरात, हे नवशे, गवशे, हवशे इतक्या मोठमोठ्या आवाजात किंचाळतात की जणु असे किंचाळल्याने त्यांना कुणीतरी शाबासकी देणार आहे. निसर्गाच्या अविरत अशा शांततेमध्ये देखील एक संगीत आहे. पक्षांची किलकील, उन्मत्त वा-याचा गोंगावणारा आवाज, अधुन मधुन येणारे प्राण्याचे, माकडांचे, भेकरांचे , मोरांचे आवाज.. वा-यामुळे सळसळणा-या गवताचा, झाडांच्या पानांचा आवाज, हे सगळे आपणास निसर्गातील सांमजस्य, हार्मनी चे दर्शन घडवतात. आणि आपण निसर्गात जाऊन काय करतो तर या सगळ्या हार्मनी मध्ये विरजन घालुन ही हार्मनी नासवतो. आपण एक दिवस तिकडे जातो व आरडाओरड करुन तेथील परीस्थितीकीस उध्द्वस्त करतो. कुणी दिला आपणास अधिकार निसर्गातील , तिथे वास्तव्यास असणा-या प्राणीमात्रांच्या , निसर्गघटकांच्या एकतानतेस नष्ट करण्याचा?

किल्ल्यावर जाणे म्हणजे जत्रा आहे काय?
साधारणतः कोणताही किल्ला पाहायचाअसेल तर जास्तीत जास्त किती सदस्य असावेत तुमच्या समुहामध्ये? ५, १० जास्तीत जास्त १५..त्यापुढे जर सदस्य संख्या गेली तर तुमचे दुर्गदर्शन होणार नाही, ती जत्रा होईल. परवा असाच एक १५० लोकांचा ग्रुप किल्ला पाहायला आला. या ग्रुपचे काही सदस्य किल्ला चढत असतानाच काही सदस्य किल्ला उतरत होते. कुठे आहे "टीम वर्क". सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा देखील संस्कार निसर्ग पर्यटनामधुन झाला पाहीजे. सदस्य मागे पुढे होणे म्हणजे फार गंभीर बाब आहे. जी निसर्गाच्या रौद्र रुपाच्या दर्शना्साठी आपणास वाट मोकळी करुन देते. अवघड, अपरीचीत वाटा, तीन चारशे फुट खोल अशा द-या, यात जर तुमच्या ग्रुप मधील कुणी भोवळ येऊन, चक्कर येऊन, किंवा हाता पायाला जखम होऊन पडला तर, त्याचे परीणाम अति भयंकर होतात. प्रसंगी जीव ही गेले आहेत, तेही तोरणा किल्ल्यावरच.
एवढ्या मोठ्या संख्येने किल्ल्यावर जाणे म्हणजे सोबत तेवढाच कचरा घेऊन जाणे होय. पायथ्याशी असलेल्या गावातुन हॉटेल वाल्याला या १५० लोकांच्या जेवणाची ऑर्डर होती. यासाठी तयार जेवण किल्ल्यावर घेऊन जाणारे काही लोक ही दिसले, की जे जेवणाची पोती, अक्षरक्षः पोती, डोक्यावर घेऊन चढत होती. या लोकांनी किल्ल्यावर बराच कचरा केला. आरडाओरड, बीभत्स गाणी, नाच...अरेरे..अशोभनीय असे हे वर्तन पाहुन खरच राग येत होता, पण नाइलाज होता..कुणी ही ऐकण्यच्या मनस्थितीते नव्हते. अगतिकता.

नोकरी धंद्या निमित्त पुण्याअत आलेले काही हिन्दी भाषिक तरुण सुध्दा दिसले. ज्यांना फक्त ट्रेकींग करायचे होते. त्यांना ना धड शिवाजी राजे माहीत,, न तोरण्याचा इतिहास. मी काही ग्रुप्सना जमेल तसे माहीती सांगण्याचा पर्यत्न केला त्यांना तो आवडला ही. यातील बरेच लोक निसर्गाप्रती संवेदन असलेले जाणवले. त्यांचा सर्व कचरा ते पुन्हा त्यांच्याच बॅगांमध्ये ठेवीत होते. मी त्यांचे कौतुक केले.

या सर्व निराशेच्या गर्तेत एक आशेचा किरण ही दिसला..
मला शिवणे, पुणे येथील एक तरुणांचा ग्रुप भेटला. त्यातील एकाने मला ओळखले. व दोन मिनिटे त्यांच्या गप्पा मारता आल्या. हे १५-२० तरुण गेली बरीच वर्षे न चुकता १४-१५ ऑगस्ट ला तोरणा किल्ल्यावर येतात व ध्वजवंदन करुन किल्ला सफाईचे काम निरपेक्ष हेतुंने करतात. यातील "आदेश पायगुडे" या तरूणास मी ओळखतो, म्हणुन फक्त त्याचाच नामोल्लेख करीत आहे. अशा तरुणांना प्रोत्साहन व सहकार्य करणे हे आपण सर्वांनी केले पाहीजे.

किल्ला म्हणजे नुसती सहल नाही, किल्ला म्हणजे अखंड प्रेरणास्त्रोत आहे.
हे प्रेरणास्त्रोत स्वच्छ, सुंदर व पवित्र राहावयास हवेत. त्यासाठी सर्वांनी आत्मपरीक्षणासोबतच कृतीशील होणे गरजेचे आहे

http://nisargshala.in

Monday, August 1, 2016

आणि दानव बाहेर येतो..

आणि दानव बाहेर येतो..

काल मढे घाटात जाण्याचा योग आला. व मढे घाटाची लागलेली वाट पाहुन त्वरीत घरची वाट पकडली...अंदाजे ७-८ वर्षापुर्वी पहिल्यांदा तिकडे गेलो असीन , तेव्हाचा मढे घाट व आत्ताचा यात जमीन आस्मानाचा फरक आहे. माहीती तंत्रज्ञान, सोशल मीडीया मुळे माहीती लवकर प्रसारीत होत आहे. त्या काळी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच पर्यटक तिथे येत, सध्या वीकयेंड ला किमान ४०० मोटारगाड्या, ५०० ते ६०० मोटारसायकली येत आहेत. म्हणजे दिड ते दोन हजाराच्या आसपास पर्यटक येत आहेत. यामुळे स्थानिकांना रोजगार मिळाला हे खरे पण ज्या सुंदर निसर्गाच्या पर्यटनाचा आनंद घ्यायला लोक येतात, त्या निसर्गाचे इतके नुकसान करीत आहेत की येत्या ५-१० वर्षात, मढे घाट दारुच्या, बीयरच्या, प्लास्टीक बाटल्या, प्लास्टीक पिशव्यांचा खच असलेला कचरा डेपो होईल की काय अशी भीती वाटते आहे. क्किती घाणेरडे प्रकार पर्यटनाच्या नावाखाली होत आहेत की ते पाहुन तळपायाची आग मस्तकात जाते. मोटारसायकल स्वार, तरुण अतिउत्साही इतके निसर्गाच्या प्रेमात पडतात की त्यांनी दिलेल्या आरोळ्या, किंचाळ्या, आरडणे ओरडणे यामुळे बाकीचे पर्यटकच नाही तर पशु, पक्षी दगड धोंडे सुध्दा क्रुध्द होतील..दुसरा प्रकार पाहायला मिलतो तो म्हणजे, मढे घाटात येऊन दारु पार्टी करणा-यांचा..यांचा सरंजाम एवढा भारी की हे लोक्स एखादा टेंपो घेऊन, त्यात गॅस सिलींडर, मटण, भाज्या, भांडी आणी सर्वात म्हहत्वाचे म्हणजे अमर्याद दारु, मग हे लोक्स घाटमाथ्यावर कुठ तरी राहुटी लावुन साग्र संगीत पार्टी करतात. तिसरा प्रकार कार मधुन येणारे पण थोडे शिकलेले लोक्स, गाडी मधील मुझ्यिक सिस्टम मोटःया आवाजात लावुन रस्त्यात मधोमध , लाज सोडुन हिडीस नाच गाणे करणारा हा प्रकार...आणि एक प्रकार आहे, तो म्म्हणजे पावसाने भिजलेल्या माता भगिनींकडे वासनांध नजरेने पाहणारा, मध्येच बीभत्स कॉमेम्टस पास करणारा......व सर्वात केविलवाणी पर्यटकांचा प्रकार म्हणजे वरील सर्व प्रकारच्या लांडग्यांपासुन स्वतःचे व स्वःतसोबत असलेल्या स्त्रियांची काळजी वाहत, दबुन दबुन, हळु हळु, जमले तर निसर्गाचा आनंद घेणारा सामान्य पर्यटक..
माणसांनी खरच का स्वतःच्या उरात एवढ्या भावंनांना दाबुन ठेवलेले असते की संधी मिळताच, किंवा आपल्या न ओळखणारे इथे कोणी ही नाही असे दिसताच, पोलीस नाही असे दिसत्ताच ह्या भावनांच उद्रेक असा व्हावा की मानवाच्या आत दडलेला "दानव"च बाहेर यावा?



Sunday, July 24, 2016

ढोंगी दलितवाद

तथाकथित विज्ञानवादी, बुध्दीवादी, विवेकवादी विचारवंत (म्हणजेच काय तर झम्डु बामसेफी, ब्रिगेडी बांडगुळं ,फुरोगामी) पुरोगामीत्वाचा, विज्ञानाचा बुरखा ओढुन हे ढोंगी खरतर बहुसंख्यांची फसवणुक करीतह आहेत. यांना पाच हजार वर्षांची पिळवणुक दिसते, व सतत सतत त्या पिलवणुकीचे भांडवल करीत दलित साहीत्य काय,दलित सम्मेलन, दलित सिनेमा काय, दलित चित्रकला काय,,,,,नाही नाही ते प्रकार क्करुन दलितांचे दलितपण टिकवुन ठेवले आहे. आज जर आपण हे मान्य जरी केले की हजारो वर्षे एका विषीश्ट वर्गावर अन्याय झाला होता, व समानतेची वागणुक दिली गेली नाही, तरी दुसरीकडे गेल्या ७० वर्षातल हे वास्तव ह्या बेंडसाळांना का दिसत नाही की ह्याच भारयीत समाजाने, संविधान शिरसावंद्य मानीत, समरसते ची स्थापना केली. हो हाच तो भारतीय समाज आहे ज्याने संविधानाला डोक्यावर घेतल व कालसंगत परीवर्तन आत्मसात केल. कदाचित हजार वर्षात जेवढ्या अन्यायाच्या घटना झाल्या असतील त्यापेक्षा एक टक्का तरी कमी झाल्यात की नाही? जर झाल्या असतील तर त्याचे श्रेय जाते ते इथल्या परीवर्तन शील व विकसनवादी समाजमनाला. बाबासाहेबांनी दलि*आचा दलितपणा घालवण्यासाठी आयुष्य घालवले आणी ही बेंडसाळं त्याच बाबासाहेबांचे नाव घेऊन घेउन दलितपणा जीवंत ठेवीतात.(खरतर दलित हा शब्द वापरणे म्हणजे अवघड जातय, नकोस वाटतय, पण इलाज नाही)..
दलित साहित्य काय, दलित चळवळ काय, अरे काय हा वेडेपणा? जातीव्यवस्थेचे निर्मुलन करायचे ना? मग ह्या शब्दाने सुरु होणा-या सगळ्या चळवळी बंद करा. संघाचे मला या बाबतीत पटते, संघाच्या शब्दकोषात हा शब्दच नाही. तरी ही संघ जातीयवादी, मनुवादी. मनुवादी म्हणुन हिन्दुंची अवहेलना करण्याचा केविलवाणा प्रयत्न करणा-या या बेंडसाळांनी पहिल्यांदा "दलि*" हा शब्द वापरणे बंद केले तर त्यांच्या पुरोगामीत्वाची थोडी तरी प्रचीती येईल.

Wednesday, July 13, 2016

मेलेल्याच्या टाळुवरचे लोणी खाणारे ख्रिश्चन मिशनरी..

मेलेल्याच्या टाळुवरचे लोणी खाणारे ख्रिश्चन मिशनरी..

काल ससुन हॉस्पीटल मध्ये गेलो होतो. सरकारी , गोरगरीबांचा दवाखाना. लांब लांब गावा वस्त्यातुन लोक तिथे उपचारासाठी येत असतात, तसेच पेशंट्चे नातेवाईक सुध्दा व्हरांड्यांत, जागा मिळेल तिथे बस्तान मांडतात, ह्या व अशा अनेक कारणामुळे तिथे गर्दी व अस्वच्छता वाढलेली आहे. मी ज्या उपचारांकरीता गेलो होतो, ते व्यवस्थित झाले. अत्याधुनिक तंत्रज्ञान व काळजीवाहु कर्मचारी सेवक व डॉक्टर्स आहेत.
एक अत्यंत वाईट बाब तिथे ही निदर्शनास आली. व्हरांड्यात बसलेल्या सर्वच्या सर्व माणसांकडे "नवा करार" नावाचे , नवे कोरे पुस्तक दिसले. उत्सुकतेपोटी मी एका मावशींना विचारले हे काय तर त्या म्हणाल्या "आजार घालवण्यासाठी एका मॅडम ने हे पुस्तक वाचायला सांगितले व जमल्यास शेजारच्या एका मंदीरात यायला सांगितले. मॅडम कुठे आहे हे मी विचारले, त्यांना सांगता नाही आले. मी शोधाशोध केली पण कुणी सापड्ले नाही.
पण ख्रिश्चन गिधाड म्हणजेच मिशनरी लोक किती खालच्या स्तरावर जाऊन धर्मांतराचे काम करीतात हे पुन्हा एकदा दिसले.

Wednesday, July 6, 2016

प्रासंगिक - गोरक्षक आणि बुध्दीवादी

प्रासंगिक - गोरक्षक आणि बुध्दीवादी
आजच टीव्ही वर सकाळी सकाळी बातम्या पाहताना एक बातमी सांगितली गेली. भारतात एक संस्था आहे, प्राणी प्रेमी संंस्था. या संस्थेने न्यायालयात एक याचिका दाखल केली की पाळीव कुत्र्यांच्या संगोपनासाठी नियमावली तयार करुन कुत्रे पाळणा-या माणसांवर ते नियम पाळणे बंधनकारक करण्यासाठी, व न्यायालयाचे तसा आदेश ही काढला.
हे एवढ्या साठी सांगतोय की अशा प्रकारे कुत्र्या मांजरांसाठी काम करणा-या संस्थे विषयी साहजिकच आपल्या मनात एक कौतुकाची भावना येते, त्यात काम करणारे लोक किती दयाळु, कनवाळु आहेत व ते खरोखर मनुष्य म्हणुन घेण्यास पात्र आहेत असे वाटते.
आता विरोधाभास पहा, गाय, बैल यांची कत्तल होऊ नये म्हणुन काम करणारे मात्र याच देशात तथाकथित बुध्दीवाद्यांकडुन, धर्मनिरपेक्षतावाद्याकंडुन "टिकेस" पात्र होतात...आहेना गम्मत?

प्रासंगिक - इस्लाम व आतंक एक चिकित्सा

प्रासंगिक - इस्लाम व आतंक एक चिकित्सा

गेल्या ८-१० दिवसात इस्लामी दहशतवाद्यांनी ४-५ मोठे मोठे हल्ले जगभरात केलेत.
त्याच्यावर हिंदुत्व-हिंदुत्ववादी-संघी-ब्राम्हण्यवादी-पेठी इत्यादी इत्यादी शब्द सर्रास वापरणाऱ्या तथाकथित पुरोगामित्वाचा बुरखा घातलेल्या मुस्लिमांची प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहे ..
*त्यांना खरा इस्लाम कळला नाही.
*इस्लाम हे शिकवत नाही.
*कुराण असे शिकवत नाही.
*कुराणाने असे कधीच सांगितले नाही.
*पैगंबराने असे कधी सांगितले नाही.
*इस्लाम हा शांततेचा श्रम आहे.
*इस्लाम हा पैगंबराने जगाला दिलेली देणगी आहे.
*त्यांचा हा इस्लाम असेल तर हा इस्लाम आमचा नाही.
*हे त्यांचे राजकारण आहे.
इत्यादी इत्यादी ..
तर जगभरात लफडे करणाऱ्या सगळ्याच इस्लामी दहशतवाद्यांचे म्हणणे असते कि ..
*हाच खरा इस्लाम.
*इस्लाम हेच शिकवतो.
*कुराणात हेच लिहिले आहे.
*कुराण हेच सांगते.
*इतरांना कुराण समजलेच नाही.
*पैगंबरांनी हेच केले आहे.
*इस्लाम हा जगावर राज्य करण्यासाठी आला आहे.
*आमचा इस्लाम हाच खरा इस्लाम.
*आमचा धर्म आणि राजकारण हेच आहे.
____*____*____*____*____*___*____
काय आहे ना, ह्या दोन्ही बाजू याला खरा इस्लाम-कुराण समजल नाही - त्याला खरा इस्लाम-कुराण समजल नाही अस एकमेकांबद्दल बोलून जगाला मुर्खात काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
जर इतक्या वर्षात कोणालाच इस्लाम-कुराण समजल नसेल तर मग ते ठेवलय कशाला? कोणाला मुर्खात काढत आहेत हे दोन्ही गट ..
आहात ना पुरोगामी ? मग नाकारा इस्लाम-कुराण .. आहे तयारी ? ..
करा इस्लामची-कुराणाची-पैगंबराच्या आयुष्याची चिकित्सा ? आहे तयारी ? ..
गैरमुस्लिमांच्या टोळ्यांवर हल्ले, त्यातील पुरुषांची गळा चिरून हत्या करणे, त्यामधील स्त्रियांना गुलाम बनवून सेक्ससाठी आपल्या मुलांना देणे-त्यांना वाटले तर ते त्या स्त्रिया इतरांना विकू हि शकत होते ..इत्यादी गोष्टी तर पैगंबर असल्यापासून सुरु आहेत .
आता सांगा कि दहशतवादी कृत्य आणि इस्लाम वेगळे कसे ?
ब्राम्हण्य-हिंदुत्ववादी-संघी-मनुवादी असे शब्द सर्रास वापरता ना ? मग आता वापरा बर ह्या दहशतवाद्यांविरुद्ध कुराणवादी-पैगंबरवादी-हिरवे दहशतवादी असे शब्द वापरून टीका..
कधीतरी म्हणा कि इस्लाममध्ये-कुराणामध्ये-पैगंबराच्या आयुष्यात काही चुका आहेत, त्या आता काळानुरूप दुरुस्त केल्या पाहिजेत.आहे तयारी?
इस्लाम हि पैगंबराणे जगाला दिलेली देणगी आहे अस इस्लामचा स्थापनेपासूनचा इतिहास बघता म्हणावस तरी कस वाटत ?
इतर धर्मियांवर टीका करण्यापेक्षा - इतर धर्मांची चिकित्सा करण्यापेक्षा तेवढा वेळ आणि अभ्यास स्वताच्या धर्माला आणि धर्मबांधवांना दिला ना तर बर होईल ..
इस्लाम विरुद्ध इतर ..
बांगलादेशमध्ये मारल्या गेलेल्या २० लोकांमध्ये ९ इटालियन , सात जपानी, एक अमेरिकन, एक भारतीय म्हणजे एकूण १८ . मारल्या गेलेल्या २० मध्ये केवळ एक बांगलादेशी आहे आणि इतर सगळे विदेशी आहेत.
म्हणजे हि लढाई मुस्लीम विरुद्ध गैरमुस्लिम अशीच होती.इस्लामची लढाई कोणाबरोबर आहे हे तर स्पष्ट झाल.
हे असच सुरु राहील तर जगात इस्लामवर बंदी येईल आणि हि वेळ देखील फार लांब नाही .
बर्याच मुस्लीम विचारवंतांचे म्हणणे असते कि इस्लामी आतंकवादाचे सगळ्यात जास्त बळी मुसलमानच आहेत. नक्कीच त्याचं खर आहे. तरी सुद्धा कुराणा विरुद्ध न बोलन , इस्लामिक शिक्षनाविरुद्ध न बोलन , त्यामधील चुका दुरुस्त करण्याबद्दल न बोलन काय सांगत ? इस्लाममध्ये मुलभूत चुका आहेत हेच मान्य करायचं नाही - त्या सुधारण्याचा प्रयत्न करायचा नाही आणि आतंकवादाविरुद्ध बोलायचं ? .. ज्या दिवशी हे सुरु कराल त्या दिवशी दहशतवाद संपायला खरी सुरुवात होईल ..

Wednesday, May 25, 2016

महान भारत - होता, आहे व असेल ही..

महान भारत - होता, आहे व असेल ही..
#IndianAchievements
भारताचा भुतकाळ वैभवशाली होता हे म्हणण्यासाठी आपणास रामायण, महाभारत, वेद, उपनिषदे, पुराणे यांचे दाखले देण्याची गरज नाही. अगदी सतराव्या अठराव्या शतकापर्यन्त भारत विविध क्षेत्रात जगभरात अग्रेसर होता. बुध्दीप्रामाण्याची कास धरणा-यांनी, सप्तरंगांच्या दुनियेचे पाईक , विवेकवादी, नास्तिक आदी लोकांना ही भारताविषयी अभिमान वाटेल असा आपला भुतकाळ होता. जे देशभक्त आहेत खरतर त्यांना ह्या अशा दाखल्यांची गरज नाही, पण आपली देशभक्ती ही या देशात जन्माला आल्यामुळेच निर्माण झालेली असेल तर त्या देशभक्तांनी सुध्दा "पोकळ देशभक्तीच्या" गप्पा मारण्यापेक्षा वाचन केले व "भारत खरच महान होता" हे जाणुन घेऊन भारताचे महानत्व पुढे नतमस्तक झाले तर "सोने पे सुहागा" होउन जाईल.

श्री धरमपाल हे महात्मा गांधीजींचे निकटवर्तीय व अनुयायी. गांधींजीच्या सांगण्यावरुन त्यांनी ब्रिटीश रेकॉर्डस चे अनुशीलन सतत २० वर्षे केले. या अभ्यासामध्ये त्यांनी तात्कालिन ब्रिटीश इस्ट ईम्डीया कंपनीचा ब्रिटीश संसदेशी, सांसदांशी, शासनाशी झालेला पत्र व्यवहार, विविध रीपोर्ट्स, भारतातील ब्रिटीश अधिका-यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी झालेला पत्रव्यवहार, तसेच विविध अहवाल यांचा समावेश आहे. हे सर्व करण्यासाठी त्यांनी ब्रिटीश संग्रहालये, अर्काईव्ह्स यांचा सखोल व निरंतर अभ्यास केला. त्यांच्या अभ्यासाचा मुळ हेतु ब्रिटीश पुर्व काळातील भारतातील विज्ञान, तंत्रज्ञान, औद्योगिकीकरण, शैक्षणिक स्थितीचा धांडोळा घेणे हा होता. त्यांनी केलेल्या अभ्यासाचा परीपाक "द ब्युटीफुल ट्री" या नावाने प्रसिध्द केला गेला. यात एकुण पाच भाग आहेत.जिज्ञासुंसाठी या प्रबंधाची लिंक देत आहे.

http://www.arvindguptatoys.com/arvindgupta/beautifultree.pdf