Sunday, February 19, 2017

काय महाराज सुफी पंथांचे होते?

जास्तीत जास्त लोकांपर्यन्त शेयर करा व शेवटी दिलेल्या लिंक वर जाऊन या लेखास "१" म्हणजे "एक" असे रेटींग देऊन आपापली नाराजी नोंदवा.

आज सकाळ वर्तमान पत्रातील सप्तरंग या पुरवणीमध्ये छापलेल्या भोकाटेच्या लेखास माझी प्रतिक्रिया...

काय महाराज सुफी पंथांचे होते?
भोकाटे पिसाळलाय आणि सकाळ वाले सुध्दा पिसाळले आहेत.

सकाळ समुहा सारख्या प्रतिष्टीत व निष्पक्ष माध्यमाने अशा प्रकारच्या लेखास प्रसिध्द करणे "सकाळ" च्या प्रतिमेस धक्का आहे. लेखक एकीकडे म्हणतो आहे की महाराजांनी सर्व जातीधर्मातील लोकांना सामावुन घेतले व या म्हणण्यास आधार देण्यासाठी काही उदाहरणे देखील दिली आहेत. ही उदाहरणे देताना लेखकाने त्या त्या जातीच उल्लेख न विसरता केला आहे. मुळात जात पाहुन कुणाची नेमणुक केली असेल असे म्हणने महाराजांचा एक प्रकारे केलेला अपमानच आहे. महाराज जात व्यवस्थेला थारा देत नव्हते तर मग जात पाहुन त्यांनी नेमणुका केल्या असतील असे मानणे व सकाळ सारख्या प्रगल्भ वृत्तपत्राने असा सुमास लेख प्रसिध्द करावा हे हास्यास्पदच आहे. "व्यक्तिच्या गुणवत्तेच्या आधारावर महाराजांनी नेमणुका केल्या" हे सर्वात महत्वाचे आहे. व अधोरेखीत करणे आवश्यक आहे.
पुढे .... दौलत खान, इब्राहिम खान आदींचा जो उल्लेख लेखकाने केला आहे, तो अर्धवट आहे. हे लोक स्वराज्य निर्मीतीचे ध्येय घेऊन महाराजांसोबत आलेले नव्हते. नंतरच्या काळात ह्या लोकांनी स्वराज्याच्या गनिमांना सामील होऊन साथ दिल्याचे पुरावे उपलब्ध आहेत.
जातीच्या नावांचा उल्लेख करताना लेखक "ब्राम्हण" जातीचा उल्लेख करण्याचे टाळतो हा देखील पक्षपातच आहे. "जानवे" शब्दाचा अर्थ प्रतिष्टा असा घेताना जाणीवपुर्वक तेथेही ब्राम्हण जातीचा उल्लेख टाळतो. स्वराज्याच्या यज्ञात सर्व समाजाचे योगदान होते मग काय ब्राम्हण समाजाचे काहीच योगदान नव्हते?
पुढे जाऊन लेखक असे अकले चे तारे तोडतो की महाराज सुफी पंथ मानणारे होते. उद्या म्हणतील महाराज मुस्लीम होते. व अरबस्थानात शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे व महाराजांचे पुर्वज देखील अरबस्थानातुनच आल्याचे पुरावे ही देतील.
माझे म्हणने आहे की महाराजच काय तर यच्चयावत हिंदु समाज सहिष्णु असल्याने आपणास पर-पंथाविषयी आदर नेहमी आहेच. शिवरायांना देखील होता. पण फक्त तेवढीच गोष्ट अधोरेखीत करुन लिहिणे म्हणजे पुनश्च पक्षपात आहे. महाराजांनी सनातन वैदीक पध्दतीने राज्याभिषेक करवुन घेतला. त्याच्या मोहीमा दस-याच्या (सीमोल्लंघन) मुहुर्तावर म्हणजेच वैदीक परंपरेला साजेशा निघत. रामायण महाभारत वाचुन महाराजांचे शिक्षण झाले. लिहिण्यासारखे खुप काही आहे. महाराजांनी सुल्तानी आणि अस्मानी अशा दोन्ही संकटांपासुन येथील प्रजेला संरक्षण देऊन , मग्रुर, धर्मांध,अत्याचारी, बलात्कारी, चारीत्र्यहीन अशा हिंदुस्थानात ज्याकाळी चहु दिशांना इस्लामी राजे, बादशाह व राज्ये होती व हिन्दु केवळ गुलाम होते, अशा वेळी "एक हिन्दु राजा होऊ शकतो" व राज्य ही करु शकतो हे महाराजांनी सिध्द करुन दाखवले.
त्यामुले अधोरेखीत काही करायचे असेल तर "महाराज एक अभिषिक्त हिन्दु राजे होते" हे वाक्य अधोरेखीत करा.
मुळात मावळ्या-मराठ्यांचे जाती-जातीत विभाजन करणारे असे लेखन समाजासाठी घातक आहे. त्यातही समाजमनातुन जाणीवपुर्वक विशिष्ट जातीला विस्मरणात ढकलण्याचे मोठ्या षडयंत्रामध्ये लेखकासोबतच "सकाळ माध्यम समुह" देखील सामील आहे असा दर्प या लेखातुन व त्याच्या सकाळ मधील प्रसिध्दीतुन येत आहे.

http://beta1.esakal.com/saptarang/chatrapati-shivaji-maharaj-jayanti-31165

No comments:

Post a Comment