Showing posts with label धर्मनिरपेक्षता. Show all posts
Showing posts with label धर्मनिरपेक्षता. Show all posts

Monday, February 8, 2016

एकेश्वरवाद - सांप्रदायिक स्वातंत्र्यावर गदा आणतो.

एकेश्वरवाद - सांप्रदायिक स्वातंत्र्यावर गदा आणतो.

एकेश्वरवाद मुळातच तथाकथित धर्मनिरपेक्षतेच्या मुळावर केलेला आघात आहे. जर धर्मनिरपेक्षता शिकवायचीच असेल तर ती त्यांना शिकवा की जे म्हणतात की आमचा मार्ग, पंथच योग्य व तुमचा अयोग्य. आमच्या पंथांच्या लोकांनाच सदगती मिळणार, इतरांना नाही. आमचा पंथ श्रेष्ट म्हणुन आम्ही इतरांपेक्षा श्रेष्ट व इतर सर्व तुच्छ. आमच्याच आस्था महान, आमचाच देव महान, आमचाच ग्रंथ महान, आमचेच सर्व काही महान. भारतीय लोकांनी कधीही असा अट्टाहास केला नाही, भारतात अनेकेश्वरवाद हजारो वर्षे जोपासला गेलाय..
अरे ज्या लोकांवर हजारो वर्षे संप्रदायिक सहिष्णुतेचे संस्कार झालेत त्यांना तुम्ही धर्मनिरपेक्षता शिकवता? परदेशातुन आपल्या देशात आलेल्या ज्या दोन पंथांच्या संदर्भात आज देशात "सेक्युलॅरीजम खतरे मे है"चा आलाप गायला जातोय , नेमके तेच दोन सांप्रदाय एकेश्वरवादी आहेत. ते नुसतेच एकेश्वरवादी नाहीत तर विस्तारवादीही आहेत. अरे मुर्ख बेगडी धर्मनिरपेक्ष भारतीयांनो, आम्हाला नका शिकवु सांप्रदायिक सौहार्द, ते शिकवा फक्त देशाच्या बाहेरुन आलेल्या सांप्रदायांच्या अनुयायांना. तुम्ही ते कितीही शिकवा तरीही हे लोक, जिहाद केल्यावाचुन राहणार नाहीत किंवा विहीरीत पावाचे तुकडे टाकायचे थांबवणार नाहीत. त्यामुळे सेक्युलॅरीजमचे धडे भारतीयांना देणे बंद करा.