Saturday, September 2, 2017

जीडीपी आणि नोटबंदी



२०१७-१८ च्या दुस-या तिमाहीमध्ये भारताचा जीडीपी वाढीचा दर ७.४ % इतका म्हणजे जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असा होता. तोच २०१६च्या दुस-या तिमाहीमध्ये हा दर ९.२ % इतका होता. २०१४ ला तो ८.३ % इतका होता. म्हणजे मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर सुरुवातीला हा दर कमी झाला व नंतर २०१६ पर्यंत तो ९.२ % इथवर पोहोचला. आणि अर्थ शास्त्रींच्या मते २०१७ च्या ४थ्या तिमाहीपर्यंत हा दर ७.१ % पर्यंत पोहोचेल. चालु तिमाहीमध्ये उत्पादन क्षेत्र, खाणकाम आणि बाम्धकाम क्षेत्रामध्ये मागच्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत जास्त घट झाली आहे. त्याच वेळी आर्थिक सेवा, संरक्षण, दुरसंचार, हॉटेलींग, वाहतुक, व्यापार आदी क्षेत्रामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आता नोटबंदीमुळे उत्पादन क्षेत्रात वाढ कमी झाली असे मानायचे का? बांधकाम क्षेत्राचे एकवेळ मान्य करता येईल कारण ते क्षेत्र त्या मानाने खुपच असंघटीत व व्यवस्थेला बगल देणारे आहे. त्यामुळे नोटबंदीचा फटका बांधकाम क्षेत्रास झाला हे एकवेळ मान्य करावे लागेल. राहीला प्रश्न खनिज खाणकाम. भारतील बहुतांश खनिजे खाणी सरकारी लिलाव पध्दतीने खाणकामासाठी विकल्या जातात. यातुन मिळणारे खनिज मुख्यत्वे करुन भारतातीलच उत्पादन क्षेत्रासाठी व थोड्या प्रमाणात निर्यात केले जाते. उत्पादन क्षेत्रातच मंदी असल्याने स्वाभाविकच खनिज उत्पादनावर त्याचा परीणाम होणारच. आता आपण उत्पादन क्षेत्रात मंदीचे कारण नोटबंदी असु शकते का याचा शोध घेण्याचा प्रयत्न करु. 2013 मध्ये हाच दर ४.१ % इतक्या नीचांकी पातळीवर गेला होता व पुन्हा २०१६ मध्ये ९.२% इतक्या उंचीवर जाऊन आला. सोबतदिलेला चार्ट पाहिल्यावर आपणास हे नक्की समजेल की जीडीपी मध्ये चढ उतार हा मागणी आणि पुरवठा या साध्या तत्वावर अवलंबुन आहे. उत्पादन क्षेत्रातील घटता दर नोटबंदीमुळे झालेला नाही हे समजण्यासाठी काही मुद्दे पाहु यात.

१. उत्पादन क्षेत्रात कोणताही कच्चा माल रोखीने घेतला जात नाही
२. उत्पादन क्षेत्रात कोणत्याही कामगाराचे वेतन रोखीने दिले जात नाही
३. उत्पादन क्षेत्रात पंजीकृत कंपन्याचे उत्पादन आणि विक्री ही देखील मुळात कागदोपत्री होणार अशी अपेक्षा आसते, त्यानुसार कंपनीचे व्यवहार पध्दती रुढ झालेली असते. त्यामुळे नोटा नाहीत म्हणुन उत्पादन रखडले जाणे हे शक्यच नाही.
४. आपल्या भागात अनेक छोटे मोठे कारखाने आहेत. त्या कारखान्यांमध्ये आपल्या भागातील अनेक छोटे मोठे व्यावसायिक काही ना काही सेवा पुरवतात. जसे गाडी भाड्याने देणे, जेवण डबे, चहा, सब वेंडर, इत्यादी सर्व खर्च ह्या कंपन्या बॅकेतुनच करायच्या. सेवा पुअरवणा-यांना चेक ने पैसे चुकते केले जायचे(अजुन ही तसेच होत आहे)

एवढे सगळे व्यवहार जर नोटाशिवाय वर्षानुवर्षे सुरु आहेत तर नोटबंदीमुळे जीडीपी दर कमी झाला असे म्हणणे म्हणजे दुधखुळे पणा आणि नुसता आकस आहे यात शंका नाही.
नोटबंदीमुळे सामान्य नागरीकांस त्रास झाला यात शंकाच नाही. पण मुळात सामान्य माणसाकडे खुप मोठ्या प्रमाणात काळा पैसा (कर चुकवुन कमावलेला किंवा साठवलेला पैसा, म्हणजे रोखीने केलेले व कर चुकविलेले व्यवहार) इतका जास्त नव्हता की त्यास अगदी दररोजच रांगेत जावे लागले. जे काही थोडे फार पैसे सामान्य माणसाकडे होते ते बॅंकेत जमा करण्यासाठी एक किंवा दोन वेळाच जावे लागणे अपेक्षित होते. त्यापेक्षा जास्त वेळा बॅम्केत जावे लागले असेल, व अस्वस्थता शिगेला पोहोचली असेल तर काळा पैसा पांढरा करायचा कसा ? या एकाच चिंतेने असामान्यांचे हाल झाले. कर नाही तर डर कशाला, याप्रमाणे सामान्य जनतेने आनंदाने होणारा त्रास सहन केला. आधीच्या एका पोस्ट मधील ते श्रीमान क्ष़. होते की ज्यांना खुपच त्रास झाला. तरीही त्रास झाला हे नाकारता येत नाही. पण हा त्रास झाला म्हणुन नोटबंदीच चुकीची होती असे मानने सर्वथा अयोग्य आहे. काही लोकांचा रांगामध्ये मृत्यु देखील झाला. दुर्दैव. पण खरच नोटबंदीमुळे लोक मृत्युमुखी पडले का? तुमच्या माझ्या सारखा धडधाकट माणुस नाही मरण पावला. जे जर्जर झाले होते किंवा व्याधी होत्या , अती रक्तदाब किंवा हृद्यरोग आदी असणारेच मृत्युमुखी पडले. यात नोटबंदीचा दोष कसा काय? रांगा आम्हाला माहीत नव्व्हत्या का? , वीज बिल भरण्यासाठी रांग, फोन बिल भरण्यासाठी रांग, घरगुती गॅस टाकी मिळवण्यासाठी ४-५ तासाची रांग, राशन साठी रांग, रेल्वे तिकीटासाठी रांग, दाखले काढण्यासाठी रांग, दगडुशेठ, पंढरपुर, आळंंदी मध्ये दर्शनासाठी रांग, चितळ्यांकडे रांग, दारुच्या दुकानांमध्ये रांग, ॲडमिशन साठी रांग, रांग काय नवीन आहे आपल्याला? आणि रांगेत अपघात देखील होऊ शकतात. पण विरोधी पक्षातील लोकांनी या रांगेचा बागुलबुआ केला नोटबंदीच्या काळात. व , राई का पहाड केला. वरील पैकी ब-याच रांगा नोटबंदीच्या अनुषंगाने आलेल्या डीजीटल क्रांतीने कमी केल्या आहेत. व गॅससठीच्या रांगा नोटबंदीच्या आधीच्या जनधन व आधार जोडणी मुळे संपल्या आहेत.
सामान्य जनतेला त्रास झाला हे खरे असले तरी हा त्रास जनतेने आनंदाने स्वीकारला. दुख झाले ते त्यांनाच ज्यांच्या कडे काळा पैसा होता व तो रद्द बातल होण्याची त्यांना भिती होती.
आता मुळ मुद्द्याकडे वळु नोटबंदी यशस्वी झाली की नाही हा या लेखाचा विषय नाही. नोटबंदीचा 'क्ष' रीपोर्ट मध्ये नोटबंदी ची फलस्रुती वाचता येईल. याअ लेखाचा विषय आहे जीडीपी आणि नोटबंदीचा परीणाम. वर सविस्तर लिहिल्याप्रमाणे , नोटबंदीचा उत्पादन क्षेत्रावर अजिबात परीणाम झालेला नाही. मागणी आणि पुरवठा या साध्या तत्वावर उत्पादन क्षेत्र कार्य करते त्यानुसार उत्पादन दर वर खाली जाणे स्वाभाविक आहे. किंवा आणखी ही इतर घटक आहेत जे उत्पादन क्षेत्रावर प्रभाव टाकु शकतात. जसे प्रशासकीय सपोर्ट. निर्यात क्षमता वाढवण्यासाठीची धोरणे, गुणवत्ता धोरणे अमलबजावणी, इत्यादी. यातील कदाचित धोरणांच्या बाबतील सरकार ला दोष देता येऊ शकेल कारण ७० वर्षाची रुढ पध्दती त्यांनी ३ वर्षात बदलली नाही. असो हा वेगळा विषय आहे.
त्यामुळे जीडीपी दर घटणे आणि नोटबंदी यांचा दुर दुर पर्यंत संबंध नाही हे नक्की समजावे.

No comments:

Post a Comment