Friday, January 13, 2017

ठेवा भारतीय दर्शनांचा --अष्टावक्र गीता - एक चिंतन

ठेवा भारतीय दर्शनांचा
अष्टावक्र गीता - एक चिंतन
एकीकडे बायबल उच्चरवाने उद्गोष करीत आहे की "मनुष्य मुळात पापी आहे, व ईशु ला शरण गेल्यावरच त्याच्या पापांचे क्षालन होईल", तर अनादी काळापासुन भारतीय दर्शने , साहीत्य, मनुष्याच्या थोरवीची गीते गात आहेत. आचार्य शंकरांच्या निर्वाण षटकं मध्ये त्यानी "वयं अमृतस्य पुत्रः" असा जयघोष केला. 
आचार्य शंकराच्या आधी कित्येक हजारो वर्षे लिहिल्या गेलेल्या अष्टावक्र गीतेत, मनुष्याच्या थोरवीची, महतीची , मनुष्यातील, नव्हे नव्हे, चराचरातील प्रत्येक जीव , वस्तुतील देवत्वाचे वर्णने शब्दांच्या मर्यादेत बसवुन,त्या शब्दांनाही थोरवी प्राप्त करुन दिली आहे.

मनुष्यामधील देवत्वास स्वीकारणारे, त्याचा जयघोष करणारे, देवत्व साजरे करणारे विचार भारतीय संस्कृतीमध्ये हजारो वर्षांपासुन आहेत. हे सगळे एवढ्या साठीच लिहाअयचे की आजकाल भारतामध्ये एक विषिष्ट वर्ग देव,धर्म न मानता, केवळ "माणुसकी हाच आमचा धर्म" अशी टिमकी वाजवताना दिसतात. अशी टिमकी वाजवताना, त्यातील एक अस्पष्ट संदेश, असा दिला जातो की जणु "माणुसकी" नावाची गोष्ट भारतास ठाउकच नव्हती यापुर्वी.
अष्टावक्र गीतेच्या पहील्या अध्यायात, मुनि अष्टावक्र राजा जनकास उपदेश देताना म्हणतात, की तु कोणत्याही वर्णाचा (आजच्या भाषेत जातीचा) असु देत, तु कोणत्याही आश्रमाचा (आश्रम म्हणजे काय माहीत नसेल तर कमेंट मध्ये विचारा) असु देत, तु स्त्री असो वा पुरुष असु देत, तुला संपुर्ण अधिकार आहे, स्व-रुपा ला जाणण्याचा. कारण तु म्हणजे मुळात दॄष्य असणारे, असे काहीच नाहीस, तु शरीर नाही, तु मन बुध्दी अहंकार नाही, तु, म्हणजे तुझे वैभव वा तुझे दारीद्रय नाही, तु म्हनजे तुझ्या अवतीभवतीचा संसार नाही, तु म्हणजे हे विश्व नाहे, तु म्हणजे ही पृथ्वी नाही, तु खर तर या सा-यांचा साक्षी आहेस, चैतन्य स्वरुप आहे, या सा-यंमध्ये जे तत्व सामायिक आहे , ते तुच आहेस.
 शब्दांची किमया, कविकल्पना , उदाहरणे सुरेख दिली आहेत. दुस-या अध्यायात, जनक राजाच्या मुखातुन "स्व-रुपा" विषयी जे काही बोलवले गेले आहे , ते थोड्या अधिक फरकाने माउलींच्या ज्ञानेश्वरीतदेखील आढळते, काही अम्शी तुकोबा रायांच्या अभंगात देखील आढळते. शंकराचार्यांच्या विविध रचनांमध्ये ही अशा प्रकारचे दाखले दिले गेले आहेत.
मी (म्हणजे मानव या अर्थाने वाचा) , शुध्दबोध आहे, मी ज्ञान, ज्ञेय, ज्ञाना असे देखील काहीच नाही, मी या सर्वांच्या पलीकडचा आहे. मला नमस्कार असो.
इतक्या स्पष्ट पणे माणुसपणास नमस्कार करणारे तत्वज्ञान अन्यत्र कुठे आहे? कुठे ही नाही. त्यामुळेच मित्रहो, जो पर्यंत आपण आपल्या पुर्वजांनी दिलेल्या ज्ञानास घेण्यास अनुकुल होत नाही, जोपर्यंत आपण त्यांना स्वीकारत नाही, तो पर्यंत आपणास कधीच कळणार नाही की आपल्या संस्कृतीमध्ये किती वैविध्य , किती स्वातंत्र्य होते. आपले पुर्वज किती गहन तत्वांचे दृष्टे होते, हे आपणास कधी ही समजणार नाही जोपर्यत्न आपण त्यांच्या कार्याचा, तत्वज्ञानाचा अभ्यास करणार नाही.
मुद्दामचे या लेखात दुस-या अध्यायातील श्लोकांवर टिपणे केली नाहीत. आपण स्वतः , निवांत वेळी, एक एक श्लोक वाचुन त्यावर मनन, चिंतन कराल, ही अपेक्षा.
हेमंत सिताराम ववले

No comments:

Post a Comment