Tuesday, November 14, 2017

फरक आहे की नाही?


मानवी मनास ह्या अपरंपार सृष्टीच्या गुढतेची ओढ अगदी सनातन आहे. मनुष्यास प्रश्न पडतात म्हणुनच तो मनुष्य आहे अन्यथा तोही एक आहार-निद्रा-मैथुन यातच रमणारा आणखी एक जीव असाच असता. ह्या प्रश्न पडण्यामुळेच ज्ञानाची अनगनित क्षेत्रे खुली झालेली आहे. मग ते क्षेत्र कोणतेही असो. अगदी अध्यात्मापासुनन ते आधुनिक विज्ञानापर्यंत. व ही जी काही क्षेत्रे आहेत ती सगळीच्या सगळी मानवीच्या मनाच्या ह्या प्रश्न पडणा-या, चिकित्सक वृत्तीमुळे निर्माण झालेली आहेत.
याच चिकित्सक वृत्तीतुन विविध दर्शने मांडली गेली. ह्या दर्शनांमध्ये मानवी मुल्यांचे संकलन झालेले दिसते. याच परंपरेमध्ये भारतामध्ये अनेक सांप्रदाय गेली हजारो वर्षे उद्यास आलेले आपण पाहत आहोत. ह्या विविध सांप्रदायांमध्ये आचरण आणि मुल तत्व असे दोन्ही प्रकारचे भेद आहेत. प्रत्येक सांप्रदायाची स्वतची एक उपास्य देवता/देव आहे.
गेल्या १२०० वर्षांपासुन भारतात इस्लाम हा सांप्रदाय देखील वाढला. तो वाढण्याची कारणे सांप्रदायिक उच्च मुल्ये होती असे मुळीच नाही. इस्लाम भारतामध्ये वाढण्याचे मुख्य कारण होते तलवार. तलवारीच्या जोरावर जगभरात पसरलेला ह्या सांप्रदायाच्या अनुयायांनी भारतात देखील हिच पध्दती अवलंबीली.
सहाव्या शतकात वेद वेदांताला पुन्हा एकदा प्रस्थापित करणा-या आचार्य शंकराच्या जीवनातील एक प्रसंग या ठिकाणी सांगावासा वाटतो. त्यांच्या अल्पशा म्हणजे अवघ्या ३२ वर्षांच्या काळात त्यांनी अनेक महान कार्ये केली. भारतात अष्टदिशांना मठांची स्थापना करुन गणराज्यांमध्ये विभागलेल्या भारतास त्यांनी सांस्कृतिक एकराष्ट्रभावा मध्ये गुंफले. दरम्यान त्यांचा सामना एका बौध्द सांप्रदायाच्या एका उच्च अधिकारी व्यक्तिशी झाला (मला त्यांचे नाव आता स्मरत नाहीये) . त्या दोघांमध्ये अखंड सात दिवस वाद-विवाद , धर्मचर्चा सुरु होती. वेदांताला पुनरुज्जीवीत करण्याचे महत्कार्य करणा-या आचार्यांनी त्याअ बौध्द व्यक्तिस चर्चे मध्ये परास्त केले. त्यानंतर ती बौध्द व्यक्ति बौध्द मताचा त्याग करुन आचार्यांचे शिष्यत्व पत्करुन वैदीक परंपरेमध्ये आली. तर हे दोघेही महान असे बुध्दीजीवी होते. व तर्कशास्त्र व दर्शनशास्त्र या विषयांत तसेच धर्माचे जीवनातील स्थान या बाबतीतही ते अधिकारी होते. पण त्यांमध्ये अहंकार नव्हता. शंकराचार्य योग्य की ते बौध्द व्यक्ति योग्य असा चर्चेचा सुर नव्हता. चर्चा तत्वाधीन होती. हे तत्व मानवी जीवनास अधिक लाभदायक आहे की ते तत्व मानवी जीवनास अधिक लाभप्रद आहे या बाबतीत चर्चा होती. व ती व्यक्तिनिरपेक्ष होती. त्यामुळेच जे योग्य ते , बौध्द व्यक्तिने आत्मसात करुन वैदीक पंरंपरा स्वीकारली.
तर वरील प्रसंगावरुन आपणास हे दिसते की,  अगदी इस्लामचा जन्म होण्या अगोदर पर्यंत भारतात उपासना पध्दतीचे स्वातंत्र्य अगदी सर्वांना होते. व हि उपासना पध्दती जन्मावर आधारीत नसुन ती व्यक्तिच्या आकलन शक्तिवर व श्रध्देवर आधारीत होती. आजही आपण हेच पाहतोय भारतात. एकाच कुटुंबात अनेकविध देवतांची पुजा अर्चा करणारी अनेक मंडळी , अगदी एका छताखाली राहतात. यास काय म्हणावे? तर हे आहे साप्रदायिक सौहार्द.
बर आता हे साप्रदायोक सौहार्द आणखी खोलात जाऊन आपण पाहुयात. घरात मुलांना आवडणारे देव कोणते? तर गणपती व मारुती. बरोबर ना? बर आजपर्यंत आपण कधीतरी आपल्या मुलांना हे शिकवल्याचे आठवते आहे का, की गणपती आणि मारुती एकच आहेत. युवक किंवा प्रौढांचीए उपास्य देवता वेगळी असु शकते , किंवा एक ही असेल. पण देव देवता अनेक आहेत. व्यापाराच्या ठिकाणी आपण लक्ष्मीची पुजा करतो, व घरी कदाचित सगळेच्या सगळेच असतात किंवा, एखाद्याकडे एखादे दत्त मंदीर, किंवा विठ्ठल मंदीर ही असते देवघरात. इतके वैविध्य असताना आपण कधीही हे सगळे देव एकच आहेत असा अट्टाहास करीत नाही.
मग नेमके अल्ला आणि ईश्वर, असे शब्द द्वय आल्यावरच, हे दोघेही एकच आहेत असे भोंगळ तत्व कसे काय बरे सांगितले जाते. काही लोकांच्या मते हे दोघे ही, त्या एकाच परमात्म्याची दोन वेगळी रुपे आहेत. क्षणभर आपण असे मान्य जरी केले तरी, सामान्य माणसास,(बुध्दीजीवी नव्हे) ती परमतत्वाची भाषा कळत नसल्यानेच त्या परम तत्वाच्या अवनत रुपाची गरज निर्माण झाली. परम तत्व निराकार आहे, असे आपण समजु यात. सर्वशक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे, वगैरे, वगैरे… तर अशा निराकार अनंत अशा सत-चित-तत्वास समजुन घेण्याची सर्वांचीच कुवत नसल्याने प्रत्येकाने आपापल्या परीने , समजेल, रुचेल, प्रांत, वेश आवडेल अशा एखाद्या साकार रुपाची निर्मीती केली. ज्या लोकांनी ह्या साकार रुपाची निर्मीती केली आहे , त्यांच्या पक्षी त्यांनी निर्माण केलेले साकार रुप म्हणजेच सर्वकाही आहे. सर्वशक्तिमान कोण तर त्यांनी निर्माण केलेले रुप. त्या निर्माण करणा-यांच्या पक्षी साकाराच्या (शब्द-मुर्ती आदी द्वारे ज्याचे वर्णन करता येऊ शकते असे रुप) पलीकडे आणखी काहीही नाही.
माझ्यासारख्या माणसास जर विचारले की कोणता देव खरा आणि कोणता खोटा? किंवा कोणता देव त्या शब्दांच्या पलीकडे असलेल्या चिदानंद स्थितीचे प्रतिनिधीत्व चांगले करु शकतो? तर मी म्हणेन त्या सर्वात्म शक्तीची अभिव्यक्ति तर चराचरात होते आहे. मला कोणत्याही मुर्ती अथवा नावाची गरजच नाहीये. (सर्वम खलु इदं ब्रम्हं!!)
खंडण
१.      पण आपण ज्या दोन व्यक्तिरेखांविषयी बोलत आहोत त्या दोन व्यक्तिरेखा, दोन आहेत. ज्या अर्थी मी म्हणतोय , किंवा तुम्ही म्हणताय की त्या “दोन" आहेत त्या अर्थी त्या दोनच आहेत. एक नाहीत हे प्रथमदर्शनी सिध्द होते आहे.
२.      आधी सांगितल्या प्रमाणे आपण आपल्या मुलांना ज्याप्रमाणे गणपती आणि हनुमान एकच आहेत असे सांगण्याच्या फंदात पडत नाहीत तर ईश्वर आणि अल्ला एकच आहेत, हे शिकविण्याची घाई आपण का करतो. आपल्या मुलांस प्रश्न पडु द्या, त्यांना उत्तरे शोधु द्या, संशोधन करु द्या. का म्हणुन आपण स्वतस व पुढच्या पिढ्यांस अपंग बनवित आहोत. विचक्षण असणे हा देखील एक अमुल्य असा गुण विशेष आहे.
३.      तिसरे असे,, जर तुमचे म्हणणे असे आहे की त्या दोन असुन एकच आहेत तर, (तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा) तुमच्या इष्ट देवतेच्या जागी दुस-या देवाची उपासना कधीपासुन सुरु करताय ते सांगा? तुम्ही जर हिन्दु कुटंबात जन्मला असाल व तुमचे म्हणणे असेल की अल्ला आणि इश्वर हे एकच आहेत, तर तुम्ही कदाचित तुमच्या ह्या (नसलेल्या, जबरदस्तीने आणलेल्या) सांप्रदायिक सौहार्दाच्या हट्टाने प्रेटुन जाळीदार टोपी घालुन घरातच अल्लाची इबादत सुरु कराल देखील. पण तुम्ही असा एकतरी मुसलमान दाखवु शकाल का, की जो अल्लाची इबादत सोडुन आकंठ विठुरायाच्या भक्तिमध्ये बुडुन जाईल (दांडीया आणि गणपतीचे उदाहरण नको इथे देऊ कृपा करुन).
४.      आणखी असे, की आपण दोन्ही साप्रदायात ज्याप्रमाणे त्या दोन व्यक्तिरेखांचे वर्णन की गेले आहे, व हे केलेले वर्णन, त्या त्या सांप्रदायाच्या अनुयांयाना मान्य देखील आहे. तर ह्या वर्णनाच्या आधारावर, त्या त्या व्यक्तिरेखेच्या चरीत्रावर, उपदेशावर तुलनात्मक अभ्यास केला तर आपणास हे लगेच समजेल की ही दोन्ही व्यक्तित्वे भिन्न आहेत व ती भिन्न प्रकारचे आयुष्य जगली व भिन्न भिन्न उपदेश त्यांनी जगास दिले. मी जाणीव पुर्वक या दोन व्यक्तित्वापैकी एक श्रेष्ट व दुसरा दुष्ट असा भेद करण्याचा मोह टाळतो आहे. तो वाचकांनी करावा.
५.      आणखी एक महत्वाचा मुद्दा. एक बुध्दीजीवी म्हणुन एखाद मान्य करेल की दोघेही सारखेच आहेत किंवा एकच आहेत. कारण बुध्दीजीवी माणुस त्याच्याही पुढे जाऊन म्हणेल की ते दोघेच काय सगळी सृष्टीच एक सारखी आहे. यात भेद मुळीच नाही. कारण चराचरामध्ये एकच सामान्य तत्व आहे. विज्ञानवाद म्ह्णेल सगळ्यात अणुरेणू आहेत. सगळ्यांचे आकार भिन्न असले तरी मुलतः ते एकच आहेत. पण अल्ला आणि ईश्वर यास माणणारे लोक वैज्ञानिक नाहीत आणि बुध्दीजीवी देखील नाहीत. त्यांच्यासाठी सत्य हवे आहे. कि जे निखळ सत्य असेल. सुर्यासम प्रखर आणि तत्क्षणी योग्य-अयोग्य असा निर्णय करणारे. त्यामुळे ह्या दोन व्यक्तिरेखा एकच आहेत की भिन्न आहेत हे ठरविण्यासाठी आपणास त्या त्या व्यक्तिरेखांच्या अनुयायांच्या दृष्टीकोनातुन पहावे लागणार आहे. व मग आपण तटस्थ भुमिकेतुन, साकार रुपाच्या पार्श्वभुमीवर(च) याची पडताळणी करु शकतो.

पण जर सर्वात आधीचा जो परीच्छेद आहे, त्यात म्हंटल्याप्रमाणे, आपण जर आपल्यातील मुलभुत प्रवृतीचे (म्हणजे प्रश्न पडणे) दमन नाही केले, तर आपणास या दोन्ही व्यक्तित्वातील मधील भेद स्पष्ट दिसेल.