Tuesday, August 25, 2020

मै तो #अजर हु, और #अमर भी

मै तो #अजर हु, और #अमर भी


ना शरीर हु मै; नही हु प्राण ,
ना मै बुध्दी हु, नही हु चंचल मन।

न लगे मुझे सर्दी , नही गर्मी है मुझे लगती,
भुख प्यास सदैव मेरी, महान ज्ञान की कामना है करती ।

आलोचना स्वयं की करता कर्णकर्क्कश आलोचक हु मै,
कर्ता भी हु, साक्षी भी हु ; स्वंय का प्रशंसक भी हु मै ।

मुझे क्या पाना है, मुझको क्या खोना है ?
मै तो मुक्त हु और निर्भय भी ।

मै कौन हु कहा से आया, किसीको क्यो है बतलाना,
मै तो अजर हु, और अमर भी ॥

रचना - हेमंत ववले

Saturday, April 18, 2020

(तथाकथित) वैज्ञानिक दृष्टिकोन 🔭 : एक चिकित्सा


"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
काही शास्त्रज्ञही अवैज्ञानिक का वागतात ? 
वैज्ञानिक अथवा अवैज्ञानिक म्हणजे काय? हे विशद न करताच केवळ गृहीत धरुन केलेले विधान व शीर्षक.
अंमळ अपरिपक्व विचार जिथे आला आहे तिथे मी माझे मत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
___________

शास्त्रज्ञ हा शास्त्रीय विचारपद्धती वापरत असतो. तो त्याच्या जगण्याचा भाग असतो. स्वाभाविकच अशी अपेक्षा असते की या शास्त्रज्ञ स्वतःच्या जीवनात आपोआपच अंधश्रद्धांच्यापासून दूर राहावे, तसेच डोळसपणे जगावे. पण काही अनुभव विपरित व वेगळे येतात. आपल्या कार्यक्षेत्रात विज्ञानाची आराधना करणारा शास्त्रज्ञ प्रत्यक्ष वागताना त्याच्यापेक्षा अगदीच वेगळे वागतो. असे का घडते हे नीटपणे समजून घ्यावयास हवे.
//
शास्त्रज्ञच नव्हे तर जगातील प्रत्येक व्यक्ति नव्हे नव्हे प्राणी, सुक्ष्म, महाकाय असे सगळेच शास्त्रीय विचारपध्दती वापरीत असतात. शास्त्रीय हा शब्द हल्ली हल्ली अस्तित्वात आला आहे. किंवा हा शब्द अस्तित्वात नव्हता तेव्हा देखील हे असेच व्हायचे. तर्कबुध्दी, निरीक्षणे व निरीक्षणांवर आधारीत कर्मे असा मुळ स्वभाव चराचरातील प्रत्येक घटकामध्ये आहे. तुम्ही याला विज्ञान विज्ञान म्हणता आहात त्यामध्ये ही हेच आहे. माणसांचे सोडा, प्रत्येक सजीव आणि निर्जीव देखील अशाच पध्दतीने वर्तन करीत आहे. ते सारेच जण डोळसपणे जगतात. अगदी लहान बाळ देखील एखाद्या विस्तवाशी  तोपर्यंतच खेळेल जोपर्यंत त्याला समजणार नाही की विस्तव अपायकारक आहे. निरीक्षण,अनुभव, प्रयोगातुनच मनुष्याला आणि समस्त चराचराला योग्य काय नी अयोग्य काय हे समजते.
//
त्यासाठी शास्त्रीय विचार पद्धती व वैज्ञानिक दृष्टिकोन यातील फरक समजून घ्यावयास हवा. शास्त्रीय पद्धती ही तर्कावर आधारित, निरीक्षणावर अधिष्ठित गणिती व्यवहार आहे.
//
शास्त्रीय विचारपद्धती व वैज्ञानिल दृष्टिकोन यामध्ये काय फरक आहे बरे? दोन्ही एकच तर नाहीत का? 
//

शोधकतेपलीकडे या विचारपद्धतीची झेप जाऊ शकते. परंतु बहुधा ती जात नाही. तसा प्रयत्नही होत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन युरोपमध्ये ज्यावेळी निर्माण झाला, त्यावेळी लागलेल्या अनेक शोधांमुळे समाजाची प्रचंड घुसळण झाली. भारतात ही वेळ आलीच नाही. ब्रिटिशांच्या सत्तेमुळे भारतात विज्ञान उपरेपणाने आले. त्यामुळे सूर्य हा मध्यबिंदू असून त्याभोवती पृथ्वी फिरते अथवा माकडापासून आजचा मानव उत्क्रांत झाला या प्रतिपादनामुळे जी खळबळ युरोपमध्ये निर्माण झाली, भारतात झाली नाही.
//
शोधकतेलीकडे म्हणजे कुठे? किती पलीकडे? तर्काच्या आणि कल्पनेच्या पलीकडे? म्हणजेच जे अतर्क्य आहे, कल्पनातीत आहे तिथपर्यंत? एक कुणीतरी महान शास्त्रज्ञ म्हणुन गेला आहे की कल्पकपा ही विज्ञानाची सुपीक जमीन आहे. अतर्क्य गोष्टींची कल्पना करणे चुकीचे आहे का?
युरोपात नक्कीच घुसळण झाली. वैज्ञानिकांना आजन्म कारावास भोगावे लागले. हत्या केल्या गेल्या. मात्र भारतात असे काही झाले नाही. काही वैज्ञानिकांना गुरुजन अशी, आचार्य अशा उपाध्या दिल्या गेल्या. सुर्य मध्यबिंदु आहे ही भारतासाठी काही नवीन कल्पना नव्हती. युरोपात घुसळण झाली याचा व भारतात झाली नाही याचा अर्थ भारत मागासलेला होता असा नाही तर भारत अधिक प्रगत होता व वैज्ञानिक शोधांस अधिक मोकळ्या मनाने स्वीकारणारा होता व आज ही आहेच. याचाच परिणाम कोरोना सारख्या संकटांत देखील जिथे तबलिगी, मुस्लीम समाज नमाज साठी एकत्र येऊन सामाजिक आरोग्या धोका निर्माण करीत आहेत तिथे अगदी एक दोन घटना वगळता धार्मिक कार्यक्रमांसाठी भारतीय माणसे अजिबात एकत्र आली नाहीत. यात काय अवैज्ञानिकता , अंधश्रध्दाळुपणा आहे? की धर्मपिपासु पणा आहे?
राहिला प्रश्न माकडापासुन मानव बनण्याचा तर ही कल्पना निव्वळ एक गृहितक आहे व याबाबतीत ठोस प्रयोगावर निरीक्षणे नाहीत. त्यामुळे यालाच सत्य मानणे वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या अगदीच विरुध्द आहे. माकडापासुन माणुस ही एक शक्यता असु शकते, पण तीच एकमेव आहे व तीच तेवढी खरी आहे असे मानणे देखील वैज्ञानिक कट्टरतावाद आहे.
//
स्वाभाविकपणेच शास्त्रीय विचारपद्धती हा जीवन दृष्टिकोन न बनता विकासाचे एक सोयीस्कर अवजार बनले. वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होताना युरोपमध्ये निर्माण झालेली वैचारिक घुसळण ही तो विचार मांडणाऱ्याला स्वतःला पणाला लावायला भाग पाडत होती. भारतात शास्त्रीय विचारपद्धतीद्वारे सोयीस्कर असलेली शोधकता आली. पण निर्भयता आलीच नाही.
//
खुपच व्हेग म्हणजे वरवरचे विधान आहे हे! स्वतःला पणाला लावायला भाग पाडत होती असे म्हणताना हे श्रेय त्या व्यक्तिच्या शास्त्रीय विचार करण्याच्या पध्दतीला न देता ते दिले पाहिजे त्या त्या समाजातील अशास्त्रीय, मुलतत्ववादी विचारसरणीला. त्या त्या मुलतत्ववादी विचारसरणीने शास्त्रीय दृष्टिकोन असणा-यांना ठार केले, शिक्षा केली. अवैज्ञानिक वृत्ती होत्या म्हणुनच वैज्ञानिक वृत्तीला विरोध झाला व वैज्ञानिकांना त्रास झाला.  नवसाने कन्या पुत्र (अवैज्ञानिक विचार) होत नाहीत. संतती होण्यासाठी पती-पत्नी (स्त्री-पुरुष – शास्त्रीय विचार) दोहोंची आवश्यकता असते. असा वैज्ञानिक विचार देखील इथे मांडला गेला होताच की. असे अनेक विचार आहेत की आपल्या समाजात मुळ धरुन होतेच. यथार्थ जीवन धर्म अर्थ काम व मोक्ष या गोष्टींबोवती दाखवले आहे. धर्म म्हणजे रीलीजन असा अर्थ घेऊ नये. धर्म म्हणजे नक्की काय हे समजणे अवघड. पण थोडक्यात सांगायचे म्हणजे आजचा धर्म आहे संविधान. व अर्थ म्हणजे काय? तर अर्थार्जन. यात काय आहे बरे अवैज्ञानिक? काम म्हणजे संभोग की प्रत्येक सजीवाची सुप्त कामना असते. त्याविषयी देखील भारंभार लिहिले, वाचले, रचले, शिल्पिले आहे भारतात. मोक्ष म्हणजे अनुसंधान. स्वत्वाचा अनुसंधान. को अहम? चा शोध. अशा शोधामध्ये काय अवैज्ञानिक आहे बरे? की यामध्ये काही विध्वंसक आहे? तर नक्कीच नाही. अपायकारक जसे सो कॉल्ड विज्ञानाच्या बाबतीत आहे तद्वतच अध्यत्माच्या बाबतीत आहे. अणु उर्जेचा शोध मानवाच्या कल्याणासाठी होऊ शकतो. पण त्याच्या विरुध्द होतानाच आपण पाहतो आहोत.
//
याबरोबरच ही कोस्टर लक्षात घ्यावयास हवी की माणूस हा मुळातच केवळ बुद्धीने वागणारा प्राणी नाही. त्याचे व्यक्तिमत्त्व बुद्धी आणि भावना यातून बनलेले आहे. वरील दोन्ही बाबी लक्षात घेतल्या की शास्त्रज्ञाच्या अशास्त्रीय वागण्याचा पाया स्पष्ट होतो. एक उदाहरण ही बाब अधिक स्पष्ट करेल. एखाद्या शास्त्रज्ञाचे मूल आजारी पडले असेल तर तो सर्व आधुनिक वैद्यकीय उपचार नक्कीच करेल. परंतु त्याबरोबर देवाचा अंगारा मुलाला लावण्यात त्याला चूक वाटत नाही. त्यापुढे जाऊन मुलाला बरे वाटावे म्हणून मृत्यूंजय मंत्राचा जप करणे, देवाला नवस करणे, अनुष्ठान घालणे या बाबतीत बाबी करतानाही तो शास्त्रज्ञ संकोचत नाही. मुलावर कोणी शेजाऱ्याने करणी केली आहे व मुलाच्या आजाराचे खरे कारण ते आहे असे सांगितल्यास एखादा ताईत, तोडगा, उतारा करून दुष्ट करणीचा प्रभाव दूर करण्याचीही त्या शास्त्रज्ञांची तयारी असते. समजा असाच आणखी एक शास्त्रज्ञ स्वतःचे घर बांधत आहे, तर बांधणीचे अत्याधुनिक विज्ञान तो वापरतोच, पण जागेचे भूमिपूजन करणे, चौकटी पर्यंत काम आल्यावर चौकटीला काळी बाहुली बांधणे, मुहूर्तावर गृहप्रवेश करणे, त्याआधी वास्तुशांती विधी करणे हे सर्व करताना त्याचे शास्त्रज्ञ असणे त्याला आडवे येत नाही. याचा अर्थ कसा लावायचा असा प्रश्न नेहमी विचारला जातो. हे वर्तन योग्य नव्हेच, परंतु ते का घडते आणि कसे बदलता येईल, हा आपल्यापुढचा खरा प्रश्न आहे.
//
वैज्ञानिक दृष्टीकोन व अवैज्ञानिक दृष्टीकोन असे भेद आपण सहजच करुन टाकले आहेत. मुळात असे भेद करण्याचे कारणच नाही किंवा हे दोन विचार एकमेकांच्या विरुध्द दिशेला ठेवण्याने जास्तच नुकसान झाले आहे. विज्ञान म्हणजे नक्की काय बरे? तर चिकित्सक बुध्दीद्वारे निरीक्षण, आकलन, तर्क याद्वारे झालेले ज्ञान होय. यात बुध्दी हा मुलभुत घटक आहे. भावना अजुनही कुठेच नाहीये. तर तर्क-बुद्धीजनीत ज्ञान नसणे व ज्ञान असणे या दोन भिन्न टोकांच्या गोष्टी नाहीतच मुळात. ज्ञान नसणे इथे सुरु होऊन ज्ञानाच्या कक्षा विस्तारत जाऊन उत्तरोत्तर हे ज्ञान अधिक ठोस होत जाणे , असा खरतर विचारांचा पाया असायला पाहिजे. असे न होता स्वतःस वैज्ञानिक दृष्टीचे म्हणविणारे नकळतच समाजात वैचारिक दरी वाढवण्याचे काम अधिक जोमाने करीत आहेत. तर अवैज्ञानिक वृत्तीचा शास्त्रज्ञ असे खरेच कधी असु शकेल का? वैज्ञानिक व अवैज्ञानिक असे भाग तुम्ही पाडलेत. तर त्यालाच आधार मानुन मी ठामपणे म्हणतो की असे लोक जे ताईत, गंडा, दोरा, पुजा पाठ, शांतीपाठ आदी करतात त्यांन तुम्ही शास्त्रज्ञ म्हणताच कसे काय? तुमची बुध्दी कुठे गहाण ठेवली आहे काय तुम्ही? तो वैज्ञानिक नाहीच मुळी. इहलोकीच्या कल्याणासाठी कर्म करणे हाच एकमेव मार्ग असताना, पुजा विधी गंडे दोरे आदी जो कुणी करतो तो शास्त्रज्ञ कसा काय बरे? आणि तुम्ही त्याला शास्त्रज्ञ केवळ त्याच्या हुद्यामुळे, शिक्षणामुळे म्हणत असाल तर तुम्ही ज्ञान-विज्ञानाच्या मार्गावर अजुन पहिल्या इयत्तेत देखील नाही असे मी ठामपणे म्हणतो. आणि मी जर चुकीचा असेल तर तुम्ही असे म्हणुच कसे शकता हा आपल्या पुढचा खरा प्रश्न आहे.
//

विचार व भावना यांनी माणसाचे व्यक्तिमत्त्व बनलेले असते. यांपैकी भावनांचे संचालन करणारा मेंदूचा भाग व्यक्तीला, पाणीसृष्टीपासून मानव म्हणून त्याची जी उत्क्रांती झाली, त्यातून लाभलेला असतो. विचार करायला माणूस शिकला ही उत्क्रांतीमधील अगदी अलीकडची बाब आहे. भावना जोमदार असतात. त्या जणू मालक असतात आणि विचार त्या भावनांचा जणू सेवक असतो. त्यामुळे भावनेच्या प्रभावाखाली वर्तन केले जातेच. भावनाविश्वात अदृष्टाची भीती व अतृप्त कामनांची पूर्ती या दोन बाबी फार प्रभावीपणे अस्तित्वात असतात. 
//
विचार करायला माणुस शिकला ही उत्क्रांतीमधील अगदी अलीकडची गोष्ट आहे, असे म्हणताना किती अलीकडची गोष्ट आहे हे सुध्दा लिहायला हवे होते? मुळातच उत्क्रांतीवाद हे केवळ एक गृहीतक आहे व त्यामध्ये देखील अनेक कच्चे दुवे आहेत की ज्यांची अद्याप समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीयेत. व निरीक्षण व प्रयोग यांचा तर त्यात हा विचार सपशेल नापास होतो. तर तुमच्या सर्व विचारांचा आधारच प्रयोगातुन सिद्ध झालेला विचार नसेल तर तुम्ही पुढे काय म्हणुन बोलावे बरे?
तर विचार करण्याची क्षमता कधी निर्माण झाली यापेक्षा ही क्षमता आपल्याकडे आहे हे सत्य हातातील बांगंड्यासारखे आहे की जे स्वयंसिध्द आहे. त्याच प्रमाणे भावना देखील सत्य व स्वयंसिद्ध आहेत. यापैकी नेमके कोण श्रेष्ठ व कोण कनिष्ठ याचा देखील तुलनात्मक अभ्यास तुम्ही करताय ते उत्तमच. पण यात मला सांगावेसे वाटते थोडक्यात. स्वामी विवेकानंदांच्या एका उक्तिचा मी इथे उल्लेख करतो. हे माझे अगदी आवडते वाक्य आहे. ‘ मनुष्य प्रकृतीपर विजय प्राप्त करने के लिये उत्पन्न हुआ है, उसका अनुसरण करने के लिये नही’ इथे प्रकृती या शब्दाचा अर्थ स्वभाव असा घ्यायचा आहे. प्रकृती-निसर्ग-मुलभुत-मुलभाव-बेसिक इंस्टिक्ट्स अशा अर्थाने प्रकृती हा शब्द घ्यायचा आहे. भावनांवर विजय मिळवणे म्हणजे काय? तर बुध्दीचा देखील वापर आपल्या जीवनात करीत राहणे असा होय. स्वामीजींनी वरील वाक्य एका उपनिषदावरील व्याख्यानादरम्यान उच्चारले होते , ते सुमारे सव्वाशे वर्षांपुर्वी.
//
आजारी पडलेल्या मुलाचा पिता असलेला शास्त्रज्ञ विचारपूर्वक वैद्यकीय उपचार करतो आणि अदृष्टाच्या भीतीपोटी अंधश्रद्धेचा आचार करतो. घर बांधणारा शास्त्रज्ञ बांधकामशास्त्राप्रमाणे चोख बांधकाम करतोच करतो. परंतु त्या घरात त्याच्या मनातील अनेक अतृप्त कामनांची पूर्ती व्हावी असे त्याला मनोमन वाटत असते. स्वतःला बढती मिळावी; मुलाला इच्छित शैक्षणिक क्षेत्रात सरकारी खर्चाने प्रवेश मिळावा; मुलीचे लग्न अनुरूप ठिकाणी कमी खर्चात जमावे; घरात चार चाकी गाडी यावी, परदेशगमनाची संधी लाभावी - अशा एक ना दोन, अनेक अतृप्त कामनांची पूर्ती होण्याची आकांक्षा शास्त्रज्ञ असलेली घर बांधणारा व्यक्ती करत असते. त्यासाठी भूमिपूजन ते वास्तुशांती हा प्रवास त्याला चूक वाटत नाही. या वर्तनात चूक काहीच नाही, आपापल्या ठिकाणी दोन्ही बरोबरच आहेत
//
पहा म्हणजे अतृप्त कामनांच्या तृप्तीसाठी गंडेदोरे करणे, पुजा बांधणे इत्यादी करणे म्हणजे अंधश्रध्दा असे तुम्ही म्हणताय. बरोबर ना? मी तुम्हाला उलट प्रश्न विचारतो. काय अतृत्प कामनांच्या पुर्तीसाठी वैज्ञानिक प्रयोग करणे योग्य आहे?  वैज्ञानिक प्रयोग करुन घर, गाडी, बंगला, पैसा मिळावा अशी कामने धरणे म्हणजे अंधश्रध्दा नव्हे काय? श्रध्दा किंवा अंधश्रध्दा ही तुम्ही काय करताय त्यावर कमी ठरते पण तुम्ही कशासाठी करयात यावर जास्त ठरते.
याउलट एखादा व्यक्ति डोळे बंद करुन त्याच्या कल्पनेतील परमेश्वराचे नामस्मरण करीत असताना तो कशाचीही अभिलाषा बाळगीत नाही, कशाचीही इच्छा बाळगीत नाही असा व्यक्ति; कामनांच्या पुर्तीसाठी वैज्ञानिक झालेल्या व्यक्तिपेक्षा अधिक श्रेष्ठ नाही काय?
तुम्ही जे म्हणताय त्यात चुकच आहे. मी तुमच्या सारखा स्वतःस विज्ञानवादी म्हणुन घेत नाही. तरीही मी हे सत्य बिनधास्त पणे स्वीकारतो व सांगु शकतो. दोन्ही आपापल्या ठिकाणी बरोबर कसे काय असु शकतील बरे? हे दोन भिन्न व्यक्ति असतील तरच ते बरोबर आहे असे म्हणता येईल. जर ही एकच व्यक्ति असेल तर याला दंभ असे म्हणतात.
// 
अशा संस्कार घरीदारी, शाळेत म्हणजे सर्वच ठिकाणी अगदी लहानपणापासून होतो. तो अंतर्मनात दृढ होतो. शास्त्रज्ञ होताना कोणीही त्या व्यक्तीला सांगितलेले नसते की जे विज्ञान वापरले जाणार आहे, त्याच्यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे आणि या दृष्टिकोनाचा फायदा प्रश्नाचे अचूक उत्तर मिळवणे, म्हणजेच या उदाहरणात मुलाच्या आजाराचा योग्य उपचार करणे व निर्दोष बांधकाम करणे हा तर आहेच, परंतु तेवढाच नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा खरा फायदा हा आहे की त्यातून अचेतन सृष्टीच्या गुणधर्मांची ओळख होते, त्याद्वारे आत्मविश्वास वाढतो, मनोव्यापार निर्भर होत निर्भय होतो, मानसिक दहशत संपुष्टात येते आणि त्यामुळे आयुष्याची बौद्धिक व भावनिक प्रत वाढते. आपल्या कार्यक्षेत्रात विज्ञानाची आराधना करणारा शास्त्रज्ञ प्रत्यक्ष वागताना त्याच्यापेक्षा अगदीच वेगळे वागतो. असे का घडते हे नीटपणे समजून घ्यावयास हवे. हे आज शिक्षणात व समाजात अथवा घरात दिसत नाही व संस्कारित होत नाही. त्यामुळे शास्त्रज्ञांच्या अशा वर्तनाचे अंतर्विरोध निर्माण होतात. त्यापासून जर सुटका हवी असेल तर एक नवी व्युहरचना करावी लागेल.

//
अचेतन सृष्टीच्या गुणधर्माची ओळख प्रत्येकास कमी अधिक फरकाने अगदी जन्म झाल्यापासुन होत असते. ही ओळख होण्यासाठी त्याला कोणत्याही विज्ञान अभ्यासक्रमाची गरज नाहीये. अचेतनच नव्हे तर सचेतन सुध्दा, अशा अनेक गोष्टींविषयी कुतुहल प्रत्येकास उपजतच असते. आणि हे कुतुहल केवळ मनुष्यालाच असते असेही नाही. आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपण अनेक प्राणी, जीव यांचे विडीयो पाहतो की ज्यामध्ये हे कुतुहल त्या प्राण्यांमध्ये देखील स्प्ष्टपणे दिसते आहे. त्यामुळे तुम्ही जे काही म्हणत आहात त्यात नवीन असे काहीच नाहीये. हे तुम्ही प्रयोगाने तपासुन पाहु शकता किंवा युट्युब वरील विडीयो पाहुन शंका समाधान करुन घेऊ शकता. एका मताशी मात्र मी सहमत आहे ते म्हणजे शिक्षण व्यवस्था , मनुष्य प्राण्याच्या या मुलभुत चिकित्सक प्रवृतीला पोषक नाहीये. व ती मध्ये आमुलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे.
//

शास्त्रज्ञांच्या काही वर्तनाचे अंतर्विरोध निर्माण होतात. त्यापासून जर सुटका हवी असेल तर एक नवी व्यूहरचना करावी लागेल. तिची रूपरेषा पुढीलप्रमाणे :-

१) तर्कशुद्ध विचार करणे हे माणूस असण्याचे प्रमुख लक्षण आहे. अतार्किक विचार व त्या प्रमाणेच केलेले वर्तन हा व्यक्तीने केलेला स्वतःचा मोठा पराभव ठरेल, याचे भान आणून द्यावयास हवे. त्याबरोबरच हा रस्ता योग्य असला, प्रगतीचा असला तरी एकाकी आहे याचे भानही राखावयास हवे.
// तर्कशुध्द विचार करणे केवळ हेच मनुष्य असण्याचे प्रमुख लक्षण आहे. असा हार्ड कोडेड विचार पसरवुन आपण वैज्ञानिक विचार पध्दतीलाच गळा आवळुन मारुन टाकणार नाही काय?  अतार्किक विचार म्हणजे नक्की काय? तर प्रयोगातुन सिध्द होऊ शकत नाहीत असे विचार ना? तर त्या वि्चारांना विरोध करण्याऐवजी का नको आपण त्यांना प्रयोगासाठी उद्युक्त करावे. आणि हा रस्ता एकाकी असेक अशी भीती तरी कशी काय आपण निर्माण करु शकतो बरे? म्हणजे ज्यापध्दतीने पाप-भीरु तयार झालेत तसेच विज्ञान-भीरु देखील तयार करायचे का? …..---------म्हणुन अमान्य.
//
२) अशास्त्रीय पद्धतीने विचार करून वर्तन करणे अयोग्य असले तरी तो स्वतःचा हक्क आहे असे व्यक्ती म्हणू शकते. परंतु असे अंधश्रद्धवर्तन जेथे उघड शोषणाला आधार देते तेथे कायद्याची गरज आहे. निवडणुकीला उभे राहावे का राहू नये याचा निर्णय देवाला कौल लावून मागणे हा अंधश्रद्धेचा प्रकार आहे. पण कोणी त्याला व्यक्तिगत स्वातंत्र्यही म्हणून शकेल. मात्र एखाद्या व्यक्तीने चोरी केली की नाही, यासाठी जागृत देवस्थानासमोर उकळत्या तेलात हात घालावयास लावणे हे निश्चितच शोषण आहे. अशा वेळी या समाजातील शास्त्रज्ञ अंधश्रद्धेचे वर्तन करणार यात नवल नाही. अंधश्रद्धांच्या विरोधात सतत थेट प्रभावी प्रबोधन परिणामकारकपणे करावयास हवे. घरात, शाळेत व समाजात सर्वत्र करावयास हवे. हे प्रबोधन म्हणजे विज्ञान प्रसार नाही याचे स्पष्ट भान हवे. _या प्रबोधनात बहुतेक वेळा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष धर्माची चिकित्सा होते; म्हणून या प्रबोधनाला विरोध होतो ही मर्यादाही समजून घ्यावयास हवी.
//
धर्म चिकित्सा होते म्हणुन प्रबोधनाला विरोध होतो असे मुळीच नाहीये. एखाद्याने चोरी केली आहे की नाही हे ठरविण्यासाठी कौल मागणे हे जितके अवैज्ञानिक आहे तितकेच अवैज्ञानिक आहे सर्रस सर्वच गोष्टींना विरोध करणे. एखादा रुग्ण ज्याप्रमाणे गंडा दोरा बांधुन निरोगी होत नाही त्याप्रमाणेच बिनचुकपणे आजार कोणता आहे (डायग्नोसिस) याच्या मुळाशी न जाताच केवळ लक्षणांवरुन त्याला उपचार देणे ही देखील अंधश्रध्दाच आहे. यामुळे प्रसंगी रुग्णाचे हीत होण्याऐवजी अहीतच होते. तसेच एखाद्या आजाराविषयी आवई (हाईप) उठवुन, मनुष्याची प्रतिकारशक्तिवर काम करण्याऐवजी मनुष्यांना फक्त आणि फक्त रोगनिवारण लसीच्या शोधाच्या प्रतिक्षेत घरातच प्रतिक्षा पहायला लावणे ही देखील अंधश्रध्दाच नव्हे काय? काही कंपन्या केवळ आर्थिक नफ्या साठी औषधांची पेटंट घेतात, पेटंटचा कालावधी संपल्यावर त्याच औषधाची नावे बदलुन नव्याने पेटंत घेऊन तीच औषधे निव्वळ नफेखोरीसाठी विकत राहतात. काय ही अंधश्रध्दा नाहीये? मित्रांनो, हा तर अपराध आहे. व असा अपराध करणा-यांमध्ये स्वतःस वैज्ञानिक वृत्तीचे म्हणवुन घेणारे देखील सहभागी होताहेत.
//
३)  घरात लहानपणापासून परंपरेचे विचार, आचार मुलगा ग्रहण करतो. समाजात सर्वत्र धार्मिकतेचे वातावरण पसरवले जात आहे. त्याचा प्रभाव पडतो. दृकश्राव्य माध्यमे अत्यंत अर्थहीन अवैज्ञानिक मालिकांचा रतीब घालतात आणि शाळेत सर्वधर्मसमभावाच्या नावाने कोणत्याही धर्माची कसलीही चिकित्सा टाळली जाते. शास्त्रज्ञाने अवैज्ञानिक न वागण्यासाठी एका बहुआयामी प्रबोधनाची गरज आहे आणि आजचे कटू वास्तव असे आहे की या प्रबोधनाचा सर्व प्रमुख जागा या अंधश्रद्धेने व्यापल्या आहेत.
//
हे जर खरे असते तर भारतात जगदीशचंद्र बसु जन्मला आले नसतेच. मिसाईल मॅन घडलेच नसते. मिशन मंगल, चांद्रयान घडलेच नसते. प्रबोधनाची आवश्यकता आहेच. त्याबाबतीत मी सहमत आहेच पण त्यासाठी जी कारणे सांगितली आहेत या लेखात त्यांच्याशी मी अजिबात सहमत नाही. मनुष्याच्या उपजत कौतुहलाला हळुवार फुंकर घालणारे, त्याला उमलु देणारे असे प्रबोधन व्हावे. नाही की त्याच्या कल्पनाशक्तिला छाटणारे.
//
४) अवैज्ञानिक विचारांचे संस्कार लहानपणापासून अंतर्मनात खोलवर झालेले असतात. या अंतर्मनात प्रवेश करण्यासाठी केवळ वैचारिक प्रबोधन पुरत नाही, तर कृतिशील प्रबोधन लागते. निर्भयपणे आचार करून हे दाखवावे लागते, की त्या वर्तनातून काहीही विपरीत घडत नाही. आजची शिक्षण व्यवस्था तर अशा गोष्टींचा साधा सर्व्हेही करत नाही. गाडीला अपघात होऊ नये म्हणून तिला लिंबूमिरची बांधतात. असे करणाऱ्या व न करणाऱ्या वाहनांचे सर्वेक्षण करून त्यांच्या अपघातांच्या टक्केवारीत काहीही फरक पडत नाही हे पटवून देता येईल. ३६ गुणांची पत्रिका जमून झालेली लग्ने आणि त्याशिवायची लग्ने यांची पाहणी करून फलज्योतिषाची निरर्थकता पटवता येईल. काळ्या बाहुल्या बांधण्याचे प्रमाण वाढत आहे, त्या जमवून त्यांची होळी पेटवण्याचे कृती करता येईल. अमावस्येच्या दिवशी रात्री १२ वाजता स्मशानात सहल नेऊन भूताच्या कल्पनेला सुरुंग लावता येईल. गरोदर स्त्रीने ग्रहण पाहिल्यास जन्माला येणाऱ्या मुलाचे ओठ फाटलेले असतात, हा समज दूर होण्यासाठी समितीमधील काही लढाऊ महिलांनी स्वतःच्या गरोदरपणात ग्रहणकाळात जाहीर ठिकाणी भाजी चिरली होती आणि या समजामागील खोटेपणा प्रत्यक्षात सिद्ध करून दिला होता. अशा अनेक कृती सुचविता येतील. संतोषीमातेच्या नावाने अनेक पत्रके गावोगाव वाटली जातात. त्या पत्रकांच्या ५०० प्रती, ज्यांना ते पत्रक मिळाले असेल त्या सर्वांनी छापून इतरांना वाटाव्यात अशी सूचना त्यात असते. तसे न केल्यास गंभीर आपत्ती ओढवेल व केल्यास फायदाच फायदा होईल असा वायदा पत्रकात केलेला असतो. उगीच रिस्क नको म्हणून अनेकजण त्याप्रमाणे वागतात, तर काही जण आपल्यापुरते पत्रक निकाली काढतात. एका गावात अशीच पत्रके विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मिळाली. शिक्षक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते होते. स्वाभाविकच शिक्षक काय सल्ला देतात या कुतूहलापोटी विद्यार्थी शाळेत पत्रके घेऊन आले. शिक्षकांनी पत्रके बाहेर काढले वाचून दाखवले. नंतर म्हणाले, 'आता काळजीपूर्वक पाहा मी काय करतो ते.' मुलांच्या समोर पत्रक फाडून त्यांनी त्याचे तुकडे तुकडे केले. नंतर विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणाले 'या पत्रकात १५ दिवसांत या स्वरूपाची पत्रके छापून न वाटल्यास गंभीर परिणाम होतील अशी धमकी आहे. मी तर तुमच्या समोर पत्रक फाडले आहे. आता पहा १५ दिवसांत मला किंवा माझ्या कुटुंबीयांना काही होते का !' १५ दिवस गेले अर्थातच काही घडले नाही. विद्यार्थ्यांच्या दप्तरातून आपोआपच पत्रके बाहेर आली आणि त्यांच्या हातांनीच त्याचे तुकडे झाले. ही कृती ज्या हातांनी घडली ते मन दैवी दहशतवादाच्या धमकावणीला भावी जीवनात बळी पडणे सहजासहजी होणार नाही. मात्र या सर्व कृतीशीलतेचा मागमूसही वैज्ञानिक संस्कार देण्याचे मान्य असलेल्या कुटुंबात व समाजात वा शिक्षणात दिसत नाही.
//
वर उल्लेख केल्याप्रमाणे अंधश्रध्दा ही एक सापेक्ष संकल्पना आहे. मी शास्त्रज्ञ झालो तर मला गाडी बंगला सुंडर स्त्री, नोकर चाकर मिळेल , या कामनांच्या पुर्तीसाठी जर कुणी शास्त्रज्ञ होत असेल तर ती अंधश्रध्दाच होय. त्याच प्रमाणे फसव्या डॉक्टर कडुन नसलेल्याच आजारावर निव्वळ त्याची कमाई व्हावी म्हणुन उपचार घेत राहणे ही देखील अंधश्रध्दाच होय. अनेकदा तर सर्दी खोकल्या सारखे आजार मनुष्याच्या स्वतःच्या रोगप्रतिकार शक्तिनेच बरे होतात, तरीही डॉक्टर औषधे देतात, फी आकारतात, व लोक ती औषधे घेतात, इंजेक्शने घेतात. कालांतराने बरे होतात. व त्यांना वाटते डॉक्टरांनी बरे केले. ही देखील अंधश्रध्दाच की. मी यापुढे जाऊन असे म्ह्णतो की ही अंधश्रध्दा नाही तर ही फसवणुक आहे. जशी इथे आहे तशीच ती धर्माच्या नावाखाली सुध्दा होत आहे. त्यामुळे अंधश्रध्देचा संबंध केवळ धर्माशी जोडणे सर्वथा अयोग्य आहे. यात फसवणुक करणारा आहे व फसवणुक करवुन घेणारा देखील आहे. दोघे ही आहेत. अमावस्येच्या दिवशी स्मशानात सहल नेऊन काय हशिल होईल बरे? त्यापेक्षा अमावस्येच्या रात्री चमचम करणारे लाखो करोडो तारे दाखवा मुलांना! विरोधी भावनेने तुम्ही किंवा कुणीही काहीही करायला जाल तर विरोधच होणार. आधी म्हंटल्याप्रमाणे अवैज्ञानिक विरुध्द वैज्ञानिक असे समीकरण मांडण्यापेक्षा उत्तरोतर वैज्ञानिक , अधिक वैज्ञानिक अशा संज्ञा वापरल्या तर भेद नाहीसा होईल.
//
५) वरील सर्व मर्यादा खऱ्या आहेत. त्या ज्या प्रमाणात ओलांडल्या जातील, त्या प्रमाणात शास्त्रज्ञ हे जीवनाच्या सर्व क्षेत्रात वैज्ञानिक दृष्टिकोनाने वागण्याची शक्यता वाढेल. हीच बाब कोणत्याही सुशिक्षित अथवा अशिक्षित व्यक्तींच्या बद्दलही खरी आहे. मात्र या सर्वांसह एक जैवशास्त्रीय कारण आहे. ते असे की, माणूस हा देखील एक प्राणीच आहे. माणसाच्या मेंदूचा मोठा भाग आजही प्राण्याच्या मेंदू सारखाच आहे. उत्क्रांतीच्या अगदी अलीकडच्या काही हजार वर्षांत विचार करणारा माणसाचा मेंदू (Neocortex) विकसित झाला ही उत्क्रांती पूर्वीच्या तुलनेने फारच झपाट्याने झाली. माणसाला परंपरेने लाभलेला प्राणीमेंदू व हा उत्क्रांत झालेला विवेकी मेंदू यांची अंतर्गत सुसंगती नीट निर्माण झाली नाही. कारण नव्या मेंदूची उत्क्रांती तुलनेने खूप झपाट्याने झाली. स्वाभाविकच अनेक बाबतीत व्यक्ती ही विचाराच्या ऐवजी भावनेच्या आधारे निर्णय घेते, म्हणजेच कार्यकारणभाव डावलून भावनेच्या प्रभावाखाली निर्णय घेते.
//
पाचवा मुद्दा तर निव्वळ भंपकपणा आहे. नवीन रुपरेषा वाचताना पाचव्या मुद्द्यामध्ये काहीच रुपरेषा दिसत नाही. यात तुमच्याच लेखातील तोच तो पणा आहे. ते उत्क्रांतीवादाचे सदोष गृहितक व बुध्दी व भावना यांच्या तील तुम्हालाच न उलगडलेले द्वंद्व.
//

संदर्भ: तिमिरातुनी तेजाकडे या पुस्तकातून....
//
संदर्भ – माझी तर्कबुध्दी
//

Wednesday, October 24, 2018

कोजागरी पोर्णिमा - पुर्वार्ध

नमस्कार,


आज कोजागरी पोर्णिमा आहे. सकाळपासुन व्हॉट्सॲप फेसबुकवर असंख्य शुभेच्छा संदेश मिळाले. आपल्या समाजामध्ये अजुनही आपल्या प्राचीन चालीरीतींना, प्रथा, परंपरांना स्थान आहे याचेच हे लक्षण आहे.
अन्यथा, हे सगळे सणोत्सव सोडले तर आपण खरच आपल्या रोजच्या जगण्यामध्ये आपल्या संस्कृतीला आपण किती स्थान देतो? याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.
देवी आजच्या रात्री, पोर्णिमेच्या लख्ख प्रकाशामध्ये घरोघर दारोदार फिरुन को जागरती असे विचारते ! व जे कोणी जागे असेल त्यांच्या वर प्रसन्न होऊन त्यांना समृध्द करते. को जागरती या संस्कृत वचनाचा अर्थ आहे, कोण जागे आहे?
ही जी देवी आहे, ती लक्ष्मी देवी आहे अशा आख्यायिका वामन पुराण तसेच वात्सायन आदी ग्रंथांमध्ये आढळतात. या पोर्णिमेस विविध नावाने देखील ओळखले जाते. कौमुदी पोर्णिमा, शरद पोर्णिमा तसेच अश्विन पोर्णिमा अशी सर्रास वापरली जाणारी नावे आहेत.
भारताचे वैषिष्ट्य असे आहे की संपुर्ण भारतामध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये हा सण म्हणुन साजरा केला जाणार दिवस आहे. गुजरातेत यास शरद पुनम असे म्हंटले जाते. रास व गरबा खेळुन हा सण तिकडे साजरा करतात. बंगाली लोक याला लोख्खी पुजो असे म्हणतात. लोख्खी म्हणजे लक्ष्मी. उत्तरेत कोजागरहा असे म्हणतात. पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, इतकेच काय तर ईशान्य भारतात देखील हा सण साजरा केला जातो.
ईशान्य भारतात वनवासी जनजातींमध्ये याच रात्री एक विशेष नृत्याविष्कार केला जातो. यास होजागरी नृत्य असे म्हणतात. या सामुहिक नृत्यातुन दोन देवतांची पुजा केली जाते. एक आहे मायलोमा तर दुसरी देवता आहे खोलोमा. मायलोमा भार पिकाची देवता तर खोलोमा कपाशीच्या पिकाची देवता.
संपुर्ण भारतात अशा प्रकारे हा सण साजरा करण्यामध्ये आपल्या पुर्वजांची काही विशेष योजना होती का?
कोण जागे आहे? असे देवी विचारते तेव्हा, तिचा कृपाप्रसाद मिळावा म्हणुन आपण ही जागे राहावयास हवे, अशी जनधारणा संपुर्ण राष्ट्रात कशी काय विकसीत केली असेल?
या सणाचे मुळ भारताच्या कृषिआधारीत संस्कृतीमध्ये आहे. विविध प्रांतांमध्ये शेतातुन नुकतेच्या घरी आलेल्या धनधान्यांच्या राशींच्या सात्विक आगमनाचा व आनंदाचा हा सण आहे. व देशभरात तितक्याच उत्साहात पुर्वी साजरा केला जायचा.
आपल्या कोकणात तर या पोर्णिमेस नवान्न पोर्णिमा असे ही म्हणतात. नवान्न म्हणजे नवीन म्हणजेच नुकतेच शेतातुन घरी आणलेले धनधान्य. या रात्री याच नवीन धनधान्याची, दुधातुन खीर तयार करुन तिचा नैवेद्य देवीस, इंद्रदेवास, तसेच खुद्द धनधान्यास देखील दाखवला जायचा. काही ठिकाणी कोकणात ही प्रथा अजुनही तग धरुन आहे. यातील देवी ख-या अर्थाने ही भुमाताच आहे.
मला वाटते की देवी ने वर्षभर सर्वांना हा प्रश्न विचारलेला असतोच. व या रात्री, देवी प्रत्यक्ष प्रसन्न होत असते. ज्यांनी सजग, सतर्कतेने पणे वर्षभर काम केले आहे, ज्यांनी शेतीची योग्य ती काळजी घेऊन नियोजन करुन शेत पिकवलेले असते ते जागे असतात. व या रात्री देवी प्रत्यक्ष फळ देऊन तिच्या या पुत्र-पुत्रींस आशिर्वाद देत असते.
त्यामुळे नुसते या रात्रीच जागे म्हणजे सतर्क राहणे हा या सणाचा हेतु नसुन सदैव सतर्क असणे, सदैव समाजास सजग ठेवणे या साठीच अशा प्रकारच्या सणाचे नियोजन आपल्या पुर्वजांनी केले असावे.
तुम्हा सर्वांना कोजागरीच्या तसेच नुसती आजची रात्रच नाही तर सदैव सतर्क, सजग राहण्यासाठी खुप शुभेच्छा!
हेमंत सिताराम ववले,
निसर्गशाळा, पुणे
(टिप- या लेखाचा उत्तरार्ध पुढील काही दिवसात येईल)

Tuesday, November 14, 2017

फरक आहे की नाही?


मानवी मनास ह्या अपरंपार सृष्टीच्या गुढतेची ओढ अगदी सनातन आहे. मनुष्यास प्रश्न पडतात म्हणुनच तो मनुष्य आहे अन्यथा तोही एक आहार-निद्रा-मैथुन यातच रमणारा आणखी एक जीव असाच असता. ह्या प्रश्न पडण्यामुळेच ज्ञानाची अनगनित क्षेत्रे खुली झालेली आहे. मग ते क्षेत्र कोणतेही असो. अगदी अध्यात्मापासुनन ते आधुनिक विज्ञानापर्यंत. व ही जी काही क्षेत्रे आहेत ती सगळीच्या सगळी मानवीच्या मनाच्या ह्या प्रश्न पडणा-या, चिकित्सक वृत्तीमुळे निर्माण झालेली आहेत.
याच चिकित्सक वृत्तीतुन विविध दर्शने मांडली गेली. ह्या दर्शनांमध्ये मानवी मुल्यांचे संकलन झालेले दिसते. याच परंपरेमध्ये भारतामध्ये अनेक सांप्रदाय गेली हजारो वर्षे उद्यास आलेले आपण पाहत आहोत. ह्या विविध सांप्रदायांमध्ये आचरण आणि मुल तत्व असे दोन्ही प्रकारचे भेद आहेत. प्रत्येक सांप्रदायाची स्वतची एक उपास्य देवता/देव आहे.
गेल्या १२०० वर्षांपासुन भारतात इस्लाम हा सांप्रदाय देखील वाढला. तो वाढण्याची कारणे सांप्रदायिक उच्च मुल्ये होती असे मुळीच नाही. इस्लाम भारतामध्ये वाढण्याचे मुख्य कारण होते तलवार. तलवारीच्या जोरावर जगभरात पसरलेला ह्या सांप्रदायाच्या अनुयायांनी भारतात देखील हिच पध्दती अवलंबीली.
सहाव्या शतकात वेद वेदांताला पुन्हा एकदा प्रस्थापित करणा-या आचार्य शंकराच्या जीवनातील एक प्रसंग या ठिकाणी सांगावासा वाटतो. त्यांच्या अल्पशा म्हणजे अवघ्या ३२ वर्षांच्या काळात त्यांनी अनेक महान कार्ये केली. भारतात अष्टदिशांना मठांची स्थापना करुन गणराज्यांमध्ये विभागलेल्या भारतास त्यांनी सांस्कृतिक एकराष्ट्रभावा मध्ये गुंफले. दरम्यान त्यांचा सामना एका बौध्द सांप्रदायाच्या एका उच्च अधिकारी व्यक्तिशी झाला (मला त्यांचे नाव आता स्मरत नाहीये) . त्या दोघांमध्ये अखंड सात दिवस वाद-विवाद , धर्मचर्चा सुरु होती. वेदांताला पुनरुज्जीवीत करण्याचे महत्कार्य करणा-या आचार्यांनी त्याअ बौध्द व्यक्तिस चर्चे मध्ये परास्त केले. त्यानंतर ती बौध्द व्यक्ति बौध्द मताचा त्याग करुन आचार्यांचे शिष्यत्व पत्करुन वैदीक परंपरेमध्ये आली. तर हे दोघेही महान असे बुध्दीजीवी होते. व तर्कशास्त्र व दर्शनशास्त्र या विषयांत तसेच धर्माचे जीवनातील स्थान या बाबतीतही ते अधिकारी होते. पण त्यांमध्ये अहंकार नव्हता. शंकराचार्य योग्य की ते बौध्द व्यक्ति योग्य असा चर्चेचा सुर नव्हता. चर्चा तत्वाधीन होती. हे तत्व मानवी जीवनास अधिक लाभदायक आहे की ते तत्व मानवी जीवनास अधिक लाभप्रद आहे या बाबतीत चर्चा होती. व ती व्यक्तिनिरपेक्ष होती. त्यामुळेच जे योग्य ते , बौध्द व्यक्तिने आत्मसात करुन वैदीक पंरंपरा स्वीकारली.
तर वरील प्रसंगावरुन आपणास हे दिसते की,  अगदी इस्लामचा जन्म होण्या अगोदर पर्यंत भारतात उपासना पध्दतीचे स्वातंत्र्य अगदी सर्वांना होते. व हि उपासना पध्दती जन्मावर आधारीत नसुन ती व्यक्तिच्या आकलन शक्तिवर व श्रध्देवर आधारीत होती. आजही आपण हेच पाहतोय भारतात. एकाच कुटुंबात अनेकविध देवतांची पुजा अर्चा करणारी अनेक मंडळी , अगदी एका छताखाली राहतात. यास काय म्हणावे? तर हे आहे साप्रदायिक सौहार्द.
बर आता हे साप्रदायोक सौहार्द आणखी खोलात जाऊन आपण पाहुयात. घरात मुलांना आवडणारे देव कोणते? तर गणपती व मारुती. बरोबर ना? बर आजपर्यंत आपण कधीतरी आपल्या मुलांना हे शिकवल्याचे आठवते आहे का, की गणपती आणि मारुती एकच आहेत. युवक किंवा प्रौढांचीए उपास्य देवता वेगळी असु शकते , किंवा एक ही असेल. पण देव देवता अनेक आहेत. व्यापाराच्या ठिकाणी आपण लक्ष्मीची पुजा करतो, व घरी कदाचित सगळेच्या सगळेच असतात किंवा, एखाद्याकडे एखादे दत्त मंदीर, किंवा विठ्ठल मंदीर ही असते देवघरात. इतके वैविध्य असताना आपण कधीही हे सगळे देव एकच आहेत असा अट्टाहास करीत नाही.
मग नेमके अल्ला आणि ईश्वर, असे शब्द द्वय आल्यावरच, हे दोघेही एकच आहेत असे भोंगळ तत्व कसे काय बरे सांगितले जाते. काही लोकांच्या मते हे दोघे ही, त्या एकाच परमात्म्याची दोन वेगळी रुपे आहेत. क्षणभर आपण असे मान्य जरी केले तरी, सामान्य माणसास,(बुध्दीजीवी नव्हे) ती परमतत्वाची भाषा कळत नसल्यानेच त्या परम तत्वाच्या अवनत रुपाची गरज निर्माण झाली. परम तत्व निराकार आहे, असे आपण समजु यात. सर्वशक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे, वगैरे, वगैरे… तर अशा निराकार अनंत अशा सत-चित-तत्वास समजुन घेण्याची सर्वांचीच कुवत नसल्याने प्रत्येकाने आपापल्या परीने , समजेल, रुचेल, प्रांत, वेश आवडेल अशा एखाद्या साकार रुपाची निर्मीती केली. ज्या लोकांनी ह्या साकार रुपाची निर्मीती केली आहे , त्यांच्या पक्षी त्यांनी निर्माण केलेले साकार रुप म्हणजेच सर्वकाही आहे. सर्वशक्तिमान कोण तर त्यांनी निर्माण केलेले रुप. त्या निर्माण करणा-यांच्या पक्षी साकाराच्या (शब्द-मुर्ती आदी द्वारे ज्याचे वर्णन करता येऊ शकते असे रुप) पलीकडे आणखी काहीही नाही.
माझ्यासारख्या माणसास जर विचारले की कोणता देव खरा आणि कोणता खोटा? किंवा कोणता देव त्या शब्दांच्या पलीकडे असलेल्या चिदानंद स्थितीचे प्रतिनिधीत्व चांगले करु शकतो? तर मी म्हणेन त्या सर्वात्म शक्तीची अभिव्यक्ति तर चराचरात होते आहे. मला कोणत्याही मुर्ती अथवा नावाची गरजच नाहीये. (सर्वम खलु इदं ब्रम्हं!!)
खंडण
१.      पण आपण ज्या दोन व्यक्तिरेखांविषयी बोलत आहोत त्या दोन व्यक्तिरेखा, दोन आहेत. ज्या अर्थी मी म्हणतोय , किंवा तुम्ही म्हणताय की त्या “दोन" आहेत त्या अर्थी त्या दोनच आहेत. एक नाहीत हे प्रथमदर्शनी सिध्द होते आहे.
२.      आधी सांगितल्या प्रमाणे आपण आपल्या मुलांना ज्याप्रमाणे गणपती आणि हनुमान एकच आहेत असे सांगण्याच्या फंदात पडत नाहीत तर ईश्वर आणि अल्ला एकच आहेत, हे शिकविण्याची घाई आपण का करतो. आपल्या मुलांस प्रश्न पडु द्या, त्यांना उत्तरे शोधु द्या, संशोधन करु द्या. का म्हणुन आपण स्वतस व पुढच्या पिढ्यांस अपंग बनवित आहोत. विचक्षण असणे हा देखील एक अमुल्य असा गुण विशेष आहे.
३.      तिसरे असे,, जर तुमचे म्हणणे असे आहे की त्या दोन असुन एकच आहेत तर, (तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा) तुमच्या इष्ट देवतेच्या जागी दुस-या देवाची उपासना कधीपासुन सुरु करताय ते सांगा? तुम्ही जर हिन्दु कुटंबात जन्मला असाल व तुमचे म्हणणे असेल की अल्ला आणि इश्वर हे एकच आहेत, तर तुम्ही कदाचित तुमच्या ह्या (नसलेल्या, जबरदस्तीने आणलेल्या) सांप्रदायिक सौहार्दाच्या हट्टाने प्रेटुन जाळीदार टोपी घालुन घरातच अल्लाची इबादत सुरु कराल देखील. पण तुम्ही असा एकतरी मुसलमान दाखवु शकाल का, की जो अल्लाची इबादत सोडुन आकंठ विठुरायाच्या भक्तिमध्ये बुडुन जाईल (दांडीया आणि गणपतीचे उदाहरण नको इथे देऊ कृपा करुन).
४.      आणखी असे, की आपण दोन्ही साप्रदायात ज्याप्रमाणे त्या दोन व्यक्तिरेखांचे वर्णन की गेले आहे, व हे केलेले वर्णन, त्या त्या सांप्रदायाच्या अनुयांयाना मान्य देखील आहे. तर ह्या वर्णनाच्या आधारावर, त्या त्या व्यक्तिरेखेच्या चरीत्रावर, उपदेशावर तुलनात्मक अभ्यास केला तर आपणास हे लगेच समजेल की ही दोन्ही व्यक्तित्वे भिन्न आहेत व ती भिन्न प्रकारचे आयुष्य जगली व भिन्न भिन्न उपदेश त्यांनी जगास दिले. मी जाणीव पुर्वक या दोन व्यक्तित्वापैकी एक श्रेष्ट व दुसरा दुष्ट असा भेद करण्याचा मोह टाळतो आहे. तो वाचकांनी करावा.
५.      आणखी एक महत्वाचा मुद्दा. एक बुध्दीजीवी म्हणुन एखाद मान्य करेल की दोघेही सारखेच आहेत किंवा एकच आहेत. कारण बुध्दीजीवी माणुस त्याच्याही पुढे जाऊन म्हणेल की ते दोघेच काय सगळी सृष्टीच एक सारखी आहे. यात भेद मुळीच नाही. कारण चराचरामध्ये एकच सामान्य तत्व आहे. विज्ञानवाद म्ह्णेल सगळ्यात अणुरेणू आहेत. सगळ्यांचे आकार भिन्न असले तरी मुलतः ते एकच आहेत. पण अल्ला आणि ईश्वर यास माणणारे लोक वैज्ञानिक नाहीत आणि बुध्दीजीवी देखील नाहीत. त्यांच्यासाठी सत्य हवे आहे. कि जे निखळ सत्य असेल. सुर्यासम प्रखर आणि तत्क्षणी योग्य-अयोग्य असा निर्णय करणारे. त्यामुळे ह्या दोन व्यक्तिरेखा एकच आहेत की भिन्न आहेत हे ठरविण्यासाठी आपणास त्या त्या व्यक्तिरेखांच्या अनुयायांच्या दृष्टीकोनातुन पहावे लागणार आहे. व मग आपण तटस्थ भुमिकेतुन, साकार रुपाच्या पार्श्वभुमीवर(च) याची पडताळणी करु शकतो.

पण जर सर्वात आधीचा जो परीच्छेद आहे, त्यात म्हंटल्याप्रमाणे, आपण जर आपल्यातील मुलभुत प्रवृतीचे (म्हणजे प्रश्न पडणे) दमन नाही केले, तर आपणास या दोन्ही व्यक्तित्वातील मधील भेद स्पष्ट दिसेल. 

Monday, October 30, 2017

माणसातील निसर्ग कधी जागा होईल का?

शनिवार रविवार नेहमीप्रमाणे कॅम्पिंग ट्रिप च्या नियोजनासाठी वेल्ह्याला जाणे झाले. अगदी अचानक ठरल्यामुळे एकट्यावरच सगळी जबाबदारी आली. एकटाच असल्यामुळे दुचाकी वर जाणेच पसंत केले. पुणे बेंगलोर महामार्ग सोडुन वेल्ह्याकडे निघालो. तस पाहता चेलाडी-वेल्हे-केळद(-महाड) हा देखील राज्य महामार्गच आहे. रस्त्यावर गाड्यांची वर्दळ होतीच. दुचाकी असल्याने वेग मर्यादीत होता. त्यातच आपल्याकडे रात्रीच्या वेळी वाहने चालवताना समोरच्या गाडीच्या हेडलाईट चा झोत डोळ्यावर आल्याने डोळे दिपुन जात होते. त्यातच हेल्मेट घातले होते, त्यामुळे रस्त्यावर किंवा आजुबाजुला फारसे पाहता येत नव्हते किंवा दिसत ही नव्हते. अनेक वाहन चालकांना हे माहीतच नाही की समोरुन दुसरी एखादी गाडी आली असता आपल्या गाडीचा दुय्यम प्रकाशझोत लावुन समोरच्या चालकास त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची असते. रात्रीच्या अंधारात अशाप्रकारे डोळे दिपल्यामुळे अनेक अपघात होत असतात. आपल्याकडे समस्या अनेक आहेत. रस्त्यांवर खड्डे असणे, रस्ते अरुंद असणे, रस्त्यावर लाईटस नसणे(ग्रामीण भागात), गतिरोधक नसणे किंवा असले तर त्यांची उंची एवढी जास्त असणे की गाडी सहीत चालकाची हाडे खिळखिळी होणे, अशा अनेक समस्या आहेत. या समस्या बहुंशी शासन यंत्रणेच्या कुचकामामुळे किंवा लोकप्रतिनिधींच्या अज्ञानामुळे आहेत. व त्यामुळे देखील अनेक अपघात होत असतात. नागरीक म्ह्णुन कदाचित या बाबतीत आपण निषेध, तक्रार, पाठपुरावा यापेक्षा अधिक काही करु शकत नाही. परंतु अप्पर आणि डीपर चा उपयोग आपण वाहन चालविताना केला तर आपण काही प्रमाणात तरी डोळे दिपण्यामुळे होणारे अपघातांचे प्रमाण काही प्रमाणात करु शकतो. २०११ मध्ये या अशाच डोळे दिपण्यामुळे मला एक अपघात झाला व माझा डावा हात कायमस्वरुपी अधु झाला.
मला शनिवारी रात्री देखील अशा डोळे दिपण्यामुळे नीटसे दिसत नव्हते. अंधार होता. समोरुन एकही गाडी येत नसेल तरच रस्ता आणि रस्त्यावरचे खड्डे दिसत. संपुर्ण ३० किमी च्या प्रवासात एक अनाकलनीय गोष्ट जाणवली. दर पाच दहा फुटांवर , रस्त्यात अनेक बेडुक, रस्त्यावर धावणा-या गाड्यांच्या चाकाखाली येऊन, चिरडुन मरुन पडलेले दिसले. हजारोंच्या संख्येने असतील हे बेडुक. कधी कधी माझ्या गाडीच्या समोरुन टुणुक उडी मारताना ही अनेक बेडुक दिसले. लहान, मोठे मध्यम आकाराचे असंख्य बेडुक. एक दोन साप ही रस्त्या ओलांडताना चिरडले गेल्याचे दिसले.
बेडुक म्हणा किंवा साप म्हणा, ह्यांना काय गरज आहे रस्त्यावर येण्याची. इथे स्वतच्या गाडीच्या हेडलाईट मुळे समोरुन गाडी चलवत येणा-या माणसाचे काय हाल होतात याची तमा न बाळगणारा माणुस का म्हनुन ह्या तुच्छ बेडकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतील बरे? रस्ते माणसांनी बनवलेत. माणसांचा अधिकार आहे रस्त्यांवर. त्या रस्त्यांवर बिनधास्त उड्या मारण्याचे धाडस बेडकांनी का करावे. चुक बेडकांचीच आहे. आणि त्या सापांची सुध्दा. रस्ते नसतील तर आमची प्रगती कशी होईल? आमच्या प्रगती साठी आम्ही रस्ते बनवुच आणि जर तुम्ही तुच्छ बेडुक किंवा साप, ससे, हरण भेकर आमच्या रस्त्यावर आले तर आम्ही तुमचा क्षुद्र जीव वाचवण्यासाठी गाडीचे ब्रेक दाबण्याचे कष्ट आम्ही माणसे का बरे घेऊ? ब्रेक दाबला व आमचा वेग कमी झाला तर आमची प्रगती कशी काय होणार बरे?
पण चुक बेडकांची हे नक्की. त्यांना समजत नाही का की ह्या सगळ्या डांबरी रस्त्यांवर आले नाही पाहीजे. का बरे एवढ्या मोठ्या संख्येने हे बेडुक रस्त्यावर येऊन जीव गमावत असतील? मला काहीही सुचत नव्हते. मन सुन्न, खिन्न झाले होते. माझ्या वेळ कमी होता. मला कॅम्पसाईटवर आमचे ग्राहक येण्या आधी पोहोचायचे होते. तरी देखील मी जाताना माझ्या गाडीच्या चाकाखाली कुणी ही बेडुक मरणार नाही याची दक्षता घेत गाडी चालवीत गेलो. सोबतच मी एक पट्टेरी मण्यार, म्हणजे अतिविषारी साप, कि जो रस्त्यावर आडवा होता व हळु हळु हालचाल करीत होता असा पाहीला. माझे लक्षात आल्यावर गाडी वळवुन माघारी आलो व गाडीचा प्रकाशझोत त्याच्यावर सोडुन आणि पाय आपटुन त्याला हळु हळु रस्त्याच्या कडेला झाडीत जाण्यास भाग पाडले. आणि दुसरा गवत्या साप. अगदी गवताच्या काडी सारखाच पातळ साप. रस्त्यात जर हा दिसला तर क्वचित असे वाटेल की गवताची काडीच पडली आहे. मी अशा प्रकारे दोन्ही दिसलेल्या सापांना रस्त्याबाहेर हाकलुन लावले. रस्ता काय त्यांच्या बापाचा आहे काय? आले मोठे आमच्या रस्त्यावर.
शनिवार रविवार आमचा निसर्गपर्यटनाचा कार्यक्र्म नेहमीप्रमाणेच अमेझींग, ऑसम असा झाला. माघारी निघताना रविवारी पुन्हा अंधारले. संध्याकाळची सांजवेळ. सुर्य पश्चिमेला सिंगापुर रोडच्या पल्याड, क्षितिजाला स्पर्श करता झाला. वेल्ह्याला पोहोचेपर्यंत मी मुद्दामहुन हेल्मेटची काच लावली नव्हती. वेल्हे सोडल्यावर मात्र रस्ता थोडा सुस्थितीत असल्याने, वेग वाढवण्याची संधी मिळते. त्यामुळे हेल्मेटची काच लावुन थोडा वेग वाढवला. आणि पुन्हा दिसायला लागले त्या राज्य मार्ग क्र. ६५ वर मृतुचे तांडव. फुटाफुटवर बेडुक उड्या मारुन मारुन रस्ता ओलाम्डण्याच्या प्रयत्नात वाहनांच्या चाकाखाली जीव देत होते. पुन्हा तेच प्र्श्न कशासाठी हे बेडुक मरणाला मिठी मारण्यासाठी रस्त्यावर येत होते? तीच खिन्नता. गाडी खड्ड्यांमध्ये आदळत होती, त्यामुळे गाडीच्या वेगवेगळ्या भागांचा आवाज येत होता. हेल्मेटच्या काचेच्या बेचंगळीतुन वा-याचा आवाज येत होता, मध्ये फटाक्यांचा आवाज, मध्येच एखाद्या गाडीच्या कर्णकर्कश्श हॉर्नचा आवाज. इतके सगळे आवाज असताना देखील स्मशान शांततेचा अनुभव येत होता. जीवे जीवस्य जीवनम असे आपण म्हणतो. त्यामुळे एखाद्या प्राण्याला दुस-या प्राण्याने भुक भागवण्यासाठी मारणे हे ठिक आहे. पण ह्या असंख्य बेडकांच्या मरणाने कुणाची भुक भागतेय? कुणाला काय फायदा होतोय? विशेषतः माणसाला काय उपयोग होतोय का?

आणखी एक गोष्ट मला जाणवली ह्या ३० किमी च्या राइड मध्ये. वेल्ह्याकडुन पुणे बेंगलोर हाय वे कडे येताना, गुंजवणी नदी रस्त्याला काहीशी समांतर, एखाद्या किमी च्या अंतरावर वाहते. म्हणजे पुण्याकडे येताना माझ्या डावीकडे नदी आणि उजवी कडे डोंगररांग. हा क्रम थोडा नीट पाहु. माझ्या डावीकडे सर्वात आध डोंगररांग आहे. ही डोंगररांग देखील रस्त्याला समांतरच आहे. डोंगर , मग डोंगर उतार, मग सखल भाग. ह्या सखल भागात भात खाचरे, काही गावे आणि मग रस्ता आणि उजवीकडे पुन्हा भातशेती आणि नदी.
बेडकांच्या उड्यामारण्या मध्ये एक साधर्म होते. सर्व बेडुक रस्त्याच्या डावीकडुन उजवी जाण्याच्या प्रयत्नात असताना उड्या मारीत रस्त्यावर येऊन चिरडले जात होते. काल रात्री हे माझ्या लक्षात आले नव्हते. निसर्गचक्राच्या अनेकविध आ-यांपैकीच ही एक आरी असावी असे मला तरी वाटते. पावसाळा संपलाय. डोंगर, डोंगर उतार व नंतरच्या सखल भागातील पाणी हळु हळु कमी कमी होत जाणार. बेडुक जरी उभयचर असला तरी पाणी व जमीन एकत्रित म्हणजे त्यांचा नैसर्गिक अधिवास आहे. नैसर्गिक बदलांची चाहुल ह्या बेडकांना लागली नसेल कशावरुन? कदाचित त्यामुळे हे बेडुक भविष्यात जिथे मुबलक पाणी असेल अशा ठिकाणी स्थलांतर करीत असतील. त्या बिचा-यांना काय माहीत रस्ता म्हणजे काय? ते पाण्याच्या दिशेने प्रवासास निघाले आणि माणसाच्य प्रगतीच्या वाटेने त्यांना रस्त्यावरच निष्ठुरपणे मारले.
प्रत्येक जीव निसर्गाची अप्रतिम अशी कलाकृती आहे. प्रत्येक जीवामध्ये वैश्विक चैतन्याच्या आविष्कार होत असतो. प्रत्येक जीव निसर्गातील महान अशा सामंजस्याचा (हार्मनी) एक महत्वाचा घटक आहे. असे असताना आपण, म्हणजे मनुष्याने, अशा निष्पाप बेडकांना विनाकारण का बरे मारावे? विकास प्रगती साधताना रस्ते बनणारच. पण आपण हे का विसरतोय की रस्त्यावर चालणा-या गाडीचे स्टीयरींग आपल्या हातात आहे. ब्रेक लावणे, मर्यादीत वेग ठेवणे आपल्या हातात आहे. आपण निसर्गातील आपल्या सहचरांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करुन देखील एखाद दुसरा प्राणी अनावधाने मारला जाणे आपण समजु शकतो. पण बेदरकार होऊन बेभान होऊन आपल्या सहचरांना चिरडणे म्हणजे माणुसकी नव्हे.

एरवी, अशी बेडक आपल्या गाडी खाली मरतात याची जाणीव देखील आम्हास नसते. असो. प्रगती होणार, रस्ते होणार, गाड्या धावणार, बेडुक आदी प्राणी रस्त्या ओलांडण्याचा प्रयत्न करणार. आपण त्यांच्या असण्याचा आदर करीत त्यांचा जीव वाचवण्याच्या प्रयत्न करावा. आणि तरीही कुणी आपल्यामुळे कुणी गतप्राण झाले असेल तर किमान आपल्यातील अमानुषपणाची व या प्राण्यांच्या हकनाक मृत्युची जबाबदारी स्वीकारुन क्षणभर का होईना अंतर्मुख व्हावे व माणसातील निसर्ग जागा व्हावा..
हेमंत ववले,
निसर्गशाळा, पुणे

Wednesday, September 27, 2017

पिरंगुट येथील जागृत शक्तिस्थान – तुळजाभवानी मातेचे मंदीर.


नवरात्र – जागर शक्तिचा  

शारदीय नवरात्र तसा आपणासर्वांसाठी नेमेची येणार इतर सणांसारखाच एक सण उत्सव आहे. घराघरातुन होणारी घटस्थापना, घटाची घराघरात दररोज सकाळी भराड्याने केलेली आरती, सार्वजनिक ठिकाणी मंडप, पताका लावुन , दांडीया आदी आपल्याला तसे नवीन नाही. काही गोष्टी नवीन आहेत जसे ट्राफीक ला अडथळा करुन नऊ दिवस निघणारी माळेची मिरवणुक, मंडपांमधुन सिनेमाच्या गाण्यांचा कर्णकर्कश्श आवाज, दांडीया गरबाच्या नावाखाली होणारा बीभत्सपणा… या सगळ्या बजबजपुरीमध्ये उत्सवाचे ऐतिहासिक आध्यात्मिक आणि पारंपारीक महत्व टिकवुन ते जनसामांन्यामध्ये रुजवण्याचे काम करताना कुणी दिसत नाही याची एक खंत नवरात्र सुरु झाल्यापासुन दरवर्षी जाणवते व आतल्याआत अस्वस्थ करीत असते. यावर्षी देखील असेच घडले आहे आजपर्यंत.
कालचा अनुभव मात्र खुपच वेगळा होता. काल सायंकाळी पिरंगुट येथील भवानी टेकडी वरील तुळजाभवानी मंदीरातील आरतीच्या वेळी मंदीरात उपस्थित राहण्याचे भाग्य मिळाले. भाग्य च म्हणावे लागेल याला कारण सणाउत्सवाच्या नावाखाली सुरु असलेला आधुनिक कुरीतींना फाटा देत सार्वजनिक उत्सव कसे साजरे करावे याचे एक अतिशय छान उदाहरण पाहावयास मिळाले.  मंदीरामध्ये नवरात्रामध्ये दररोज सकाळी आणि सायंकाळी महाआरतीचा कार्यक्रम असतो व ही आरती अशा लोकांच्या हस्ते केली जाते की ज्यांनी समाजामध्ये सकारात्मक परीवर्तनासाठी मोलाचे योगदान दिले आहे. अनेकदा आपण पाहतो की दहीहंडी सारख्या उत्सवांमध्ये सिने अदाकारांना फक्त गर्दी खेचण्यासाठी आणले जाते. ५ ते १० मिनिटांचे लाख लाख रुपये समाजाच्या वर्गणीतुन गोळा केलेले पैसे असे अनाठायी उडवणारे संयोजकांच्या भाऊगर्दीमध्ये , तुळजाभवानी मंदीर विश्वस्तांनी रुढ केलेली प्रथा खरच सर्वांसाठी प्रेरणादायी, अनुकरणीय व आदर्शवत आहे, यात संदेह नाही.
काल महाआरतीसाठी आमंत्रित केलेले पाहुणेदेखील खरोखर समाजामध्ये सकाअरात्मक बदलांसाठी आयुष्य झिजवलेले असे दोन-तीन दिग्गज होते. त्यातील पहीले श्री मनोज जी वर्मा. हे श्रीमान, विश्व हिंदु परीषद, बजरंगदलाचे अखिल भारतीय संयोजक म्हणजे प्रमुख आहेत. तर दुसरे म्हणजे श्रीमंत दगडुशेठ गणेशोत्सव ट्रस्ट चे विद्यमान अध्यक्ष श्री अशोक गोडसे. तिसरे होते, वेदवेदांत गुरुकुलम चे संस्थापक आचार्य मंदार येनपुरे.  असा हा त्रिवेणी संगम कालच्या आरतीच्या वेळी झालेला. सेवा सुरक्षा आणि संस्कार हे ब्रीद असलेल्याअ बजरंग दलाचे मुळशी तालुक्यातील कामाची मुहुर्तमेढ देखील कालच रोवली गेली. दुर्गा मातेने सतत नऊ दिवस नऊ रात्री युध्द करीत असुरांचे निर्दालन केले त्यामुळेच स्त्री शक्तीच्या जागराचे प्रतीक म्हणुनच नवरात्र साजरी केली जाते. दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी हातात शस्त्र धारण करणा-या आई दुर्गेच्या प्रेरणे ने तरुणांना राष्ट्र निर्माणासाठी देववंदने सोबतच राष्ट्रवंदनेचा संस्कार करणा-या बजरंग दलाचे कार्याचा आरंभ नवरात्रीच्याअ मुहुर्तावर व्हावा याअत नक्कीच दैवी संकेत आहे यात शंका नाही. मतांच्या राजकारणापायी आजपर्यंत झालेले मुस्लीम तुष्टीकरण, असमान नागरी कायदे यासारख्या अनेक गोष्टींनी आजपर्यंत भारतात मुस्लीम धर्मांधतेचा देखील असुरच केला आहे. तसेच ख्रिस्ती धर्मप्रसारक देखील प्रलोभन आणि दहशत यांच्या बळावर सर्रास मतपरीवर्तनाचे काम करीत आहेत. व दोघेही आसुरी शक्तींचे प्रतीक आहेत. भारताचा आत्मा म्हणजे सांप्रदायिक सौहार्द व सांप्रदायिक स्वातंत्र्य. या सांप्रदायिक सौहार्दाच्या मुळावरच घाव करणारे हे दोन राक्षस देखील आज ठेचण्याची गरज आहे. व या कार्याचा शुभारंभ बजरंग दलाच्या अखिल भारतीय प्रमुखांच्या आशीर्वादाने व्हावा ही म्हणजे दुधात साखरच आहे.
धर्मादाय क्षेत्रात कसे काम करावे याचा आदर्श घ्यावा तो श्रीमंत दगडुशेठ हलवाई ट्रस्ट कडुन. विविध समाजोपयोगी प्रकल्प आणि वेळप्रसंगी नैसर्गिक आपत्तीमध्ये समाजासाठी धावुन जाणारी सर्वात तत्पर संस्था म्हणजे दगडुशेठ हलवाई ट्रस्ट. आता हा निव्वळ योगायोगच असावा असे नाही की जयतुळजा भवानी ट्रस्ट, पिरंगुट देखील अशाच प्रकारे कार्य गेली अनेक वर्षे सातत्याने करीत आहे. आज म्हणजे दिनांक २७ रोजी म्हणजे नवरात्रीतील सप्तमी या दिवशी जय तुळजा भवानी ट्रस्ट व मायमुळशीडॉटकॉम चे संपादक, आतंरराष्ट्रीय क्रिडा पत्रकार , लेखक प्रा. संजय दुधाने यांच्या संयुक्त विद्यमाने मुळशी सेवा पुरस्काराचे वितरण होणार आहे. या वर्षी हा पुरस्कार राष्ट्रीय सर्वांगिण ग्रामविकास संस्थेच्या पुनम मेहता यांचा देण्यात येणार आहे. मुळशी तालुक्यात निस्वार्थ भावनेने सर्वसामान्यांच्या हितासाठी सदोदीत झटणा-या कार्यकर्त्यांस हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. तसेच ट्रस्ट च्या वतीने सर्वज्ञ विकास प्रबोधिनीच्या अंतर्गत मुळशी तालुक्यातील तरुणांना पोलीस भरतीसाठी विनामुल्य मार्गदर्शन देखील केले जाते. मुळशी तालुक्यात आजपर्यंत असे अभिनव प्रयोग झाले नव्हते. जय भवानी ट्रस्ट ने ही प्रथा सुरु केली व यात खंड पडु दिला नाही. गेली दहा पेक्षा जास्त वर्षे अनेक प्रकारे समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्याचे काम ट्रस्ट करीत आहे. गावागावातील चौकाचौकातील अनेक गणेशोत्सव मंडळे, नवरात्री मंडळे यांनी अनुकरण करावे असे आदर्श उपक्रम जय तुळजा भवानी ट्रस्ट करीत आहेत. का नाही प्रत्येक गावागावात, त्या त्या गावामध्ये चांगले काम करणा-या गावच्याच व्यक्तिस पुरस्कार देण्यात यावा?  असो, तर या जयतुळजा भवानी ट्रस्टच्या विनंतीस मान देऊन अशोक गोडसे सारख्या दिग्गजाने इथे यावे म्हणजे पुन्हा दुधात साखर. श्री गोडसे कडुन जय तुळजा भवानी ट्रस्ट ला नक्कीच आणखी बरेच काही शिकावयास मिळाले असणार व गोडसेंनाअ देखील जय तुळजा भवानी ट्रस्ट चे काम पाहुन आनंद झाला असेल.
कालच्या आरती मध्ये उपस्थित असलेली तिसरे व्यक्तिमत्व म्हणजे आचार्य मंदारजी येनपुरे. खरतर व्यक्तिमत्व वगैरे सारखे शब्द त्यांच्या साठी वापरले तर त्यांच्यातील साधेपणाचा अपमान होईल. संस्कृत प्रचुर, वेद वेदांताचे अधिकारी अभ्यासक, अध्यापक, साधक, मदांर स्वामींनी भारतीतील महान अशा आचार्यांकडुन वेदांताचे शिक्षण, गुरुगृही राहुन घेतले. चार भांड्यांचा संसार न करता अवघ्या संसाराची, चराचराची चिंता करण्याचा संकल्प करुन, जीवन भारतमातेच्या सर्वसाधारण कन्या पुत्रांस वेदांताचे धडे देण्याचे कार्यास आरंभ केला. मुळशी तालुक्यात, चिंचवड या त्यांच्याच गावी, स्वतच्याच शेतजमीनीमध्ये गुरुकुलाची मुहुर्तमेढ रोवुन , येतील त्यांच्यासह आणि न येतील त्यांच्या शिवाय हा अवलिया अनेक वर्षे झपाटल्या सारखा कार्यरत आहे. नित्याचा स्वतचा वेद वेदांताचा अभ्यास , लौकीक सुखांचा त्याग, एक प्रकारे सर्वसंग परीत्यागच. पण समाजासाठी असणा-या प्रेमापोटी समाजामध्ये येऊन समाजाच्या उत्थानाचे काम करणारे आचार्य मंदारजींच्या हस्ते देखील काल आरती झाली. एकुणच काय तर काल पिरंगुटच्या भवानी टेकडीवर धर्मरक्षण, सेवाभाव आणि अध्यात्म या क्षेत्रात काम करणा-या तीन दिग्गजांचा त्रिवेणी संगमच झाला होता.
महाआरती सुरु होण्यापुर्वीच मी मंदीरात पोहोचलो होतो. प्रमुख पाहुणे अद्याप पोहोचायचे होते. मंदीरात सुरेल भजनाचा कार्यक्रम सुरु होता. पंचक्रोशीतील अनक भजनकरी, वादक, गायक वारकरी पंरपरेमधील कर्णमधुर भक्तिरसाने ओतप्रोत अशा भजनांची मालिका सादर करीत होते. भक्त भाविक मोठ्या आस्थेने मंदीरात येत, भक्तिभावाने मातेचे दर्शन घेऊन सभामंडपाअमध्येच भजनाच्या सुरांमध्ये हरवुन जात. हळु हळु सभामंडप भक्त भाविकांच्या गर्दीने भरुन जाऊ लागला. गर्दी वाढत होती व गर्दी नियमनाचे काम, स्वयंसेवी वृत्तीने तालुक्यातीलच तरुण-तरुणी निस्वार्थ भावनेने करताना देखील दिसत होते. हे सर्व स्वयंसेवक पोलीस भरती प्रशिक्षणासाठी टेकडीवर नित्याने येणारे, मैदानी खेळ खेळणारे आणि पुस्तकी अभ्यास करणारे देखील होते. हे सर्व स्वयंसेवक अतिशय नम्रतेने व्यवस्था सर्व व्यवस्था पाहत होते.

आजच्या आरतीचे प्रमुख पाहुणे मनोज जी वर्मा मंदीरामध्ये, त्या पाठोपाठ अशोक जी गोडसे देखील पोहोचले लगेच. आचार्य मंदार जी येनपुरे आधीच भजनी मंडळींमध्ये बसुन भजन गाण्यात तल्लिन झाले होते. ज्ञानबा तुकारामच्या गजराने भजनाची सांगता झाली व सर्व जण बसल्या जागेवर उठुन उभे राहीले. आरती लाअ सुरुवात होणार होती.  आरती म्हणण्यासाठी ज्या कार्यकर्त्यांच्या हातात माईक होता ते सर्व ट्रस्ट चे कार्यकर्तेच होते. ज्ञानेश्वर पवळे, संदीप सातव, सचिन पवळे, पखवाज वादक येनपुरे (ढोल घेऊन), रामदास पवळे, संदीप पवळे(ताशा) आणि सर्वात आकर्षक वाद्य जर कोणते होते तर ते होते संबळ. एरवी आरती म्हणण्यासाठी नेहमीचे गाणारेच पुढे असतात. इथे तसे नव्हते. ट्रस्ट चे मुख्य कार्यकर्तेच हातात माईक, वाद्ये घेऊन आरती म्हणणार होते. एखाद्या मंडळाचे अध्यक्ष , उपाध्यक्ष यांना नियोजन, व्यवस्था करण्यातुनच वेळ मिळत नाही तर आरती स्वत कसे म्हणतील. म्हणजेच काय तर देवीच्याअ ज्या मुख्य आराधनेसाठी , उपासने साठी हा सगळा अट्टाहास सुरु होता त्या मध्ये ट्रस्टचे मुख्य कार्यकर्ते सर्वांच्या पुढे होते. संबळ, घंटानाद, ताशाचा तर्रर्र ताल, ढोलाचा ठेका आणि डोळेबंद करुन कार्यकर्त्यांच्या सर्वांगातुन आरतीच्या रुपात बाहेर पडणारा आवाज सभामंडपाला अवकाशामध्ये उंच घेऊन जातो आहे की काय असा भास व्हायला लागला. हे सगळे आवाज एकत्र येऊन एक वेगळाच नादब्रम्ह जन्म घेत होता.व या नादब्रम्हामध्ये सर्व भाविक, गायक, वाद्य वाजवणारे, आरतीचे ताट हातात घेतलेले पाहुणे, स्वयंसेवक अगदी देहभान हरवुन गेले होते. हातात माईक घेऊन महाआरती गाणारे ट्रस्ट चे कार्यकर्ते आरती प्रत्येक शब्दाशी एकरुप झाले होते. देहभान हरवणे काय असते ते या आरती म्हणणा-या कार्यकर्त्यांना पाहील्यावर समजते. ह्या आरती मध्ये संगीताच्या भाषेतला सुर ताल फारसा नव्हता. पण महादेवीच्या रौद्र रुपाची उपासना करण्यासाठीचा रौद्रभाव नक्कीच होता. साक्षात शिव शंकर प्रकट होऊन तांडव करु लागतील असा वीर रस ह्या आरती मध्ये होता. जसे माईक हातात घेऊन आरती म्हणणारे देहभान हरवले होते तसेच सर्व भक्त भाविक देखील देहभान हरवुन गेले होते. इथे मी प्रकर्षाने अनुभव घेत होतो माझ्यातील समष्टीचा. मी समष्टी आहे असा अनुभव मला येतो होता. सर्वांची विभक्त भिन्न भिन्न मने एका सामुदायिक मनामध्ये विलीन झाली. एकत्वाचा हा अनुभव म्हणजे देवत्वाची अनुभुतीच आहे. व ही अवस्था अशीच राहावी असे वाटु लागले तर नवल ते काय, पण यथावकाश आरतीचे १०-१५ मिनिटे मंत्रमुग्ध होऊन सरले. संबळाचा ध्वनी थांबला, ताशाचा तांडव थांबला, घंटेचा नाद थांबला, माईक मधुन  आरती गाणा-यांचा सुर थांबला व शिल्लक राहीला तो फक्त भक्तिभाव. शिल्लक राहीली एकत्वाची अनुभुती.
एकंदरीत असा अनुभव मिळणे म्हणजे भाग्याचे आहे. काही मंदीरांमध्ये भक्तिभाव जागृत आपोआप होतो, जसे तुळजाभवानी चे तुळजापुरचे मंदीर, कानड्या विठ्ठलाचे पंढरपुर येथील मंदीर. पण तपश्चर्येच्या जोरावर, स्वच्छ चारीत्र्याच्या जोरावर , पारदर्शक कारभाराच्या जोरावर, पिरंगुट मधील तरुणांनी भवानी टेकडीवरील तुळजाभवानी मंदीर देखील एक जागृत देवस्थान बनविले असे म्हंटल्यास वावगे होणार नाही.
बजरंग दलाच्या तालुक्यातील कार्यास ह्या जागृत तुळजाभवानी मातेने आशीर्वाद दिलाय. बजरंग दलाचे तालुक्यातील धर्मरक्षण व संवर्धनाचे काम भवानी मातेच्या आशीर्वादाने यशस्वी होईल यात देखील शंका नाही.


श्री. हेमंत ववले,
भरे गाव

Sunday, September 24, 2017

नभं उतरु आलं, चिंब थरथर वलं ।

नभं उतरु आलं, चिंब थरथर वलं ।
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात ॥
तसा मी रोमॅंटीक वगैरे नाही, आणि नाही कधी वरील गाणे मन लावुन ऐकले किंवा पाहीले आहे. पण नभातुन वाहणारे मेघ जेव्हा माझ्या अंगावर आले तेव्हा ह्या गाण्याच्या ओळी उस्फुर्त पणे आठवल्या. काळ कितीही पुढारलेला असला तरी सार्वजनिक जीवनात प्रेमास्पद आणि प्रेमिका (पती पत्नी देखील) प्रेमभावनेची अभिव्यक्ति करणे जड जाते, हे आपल्या अंगवळणी नाहीये अजुन. हा सहज प्रेम भाव म्हणजे नुसत प्रेमीका आणि प्रेमास्पद यांच्यापुरताच मर्यादीत आहे का?
खरतर प्रेम या विषयावर लिहिण्याचा माझा अधिकार कितपत आहे हे ,मला ठाऊक नाही. तरीही निसर्गाच्या सदोदीत सानिध्याने , पुर्वी केलेल्या थोड्याफार वाचनाने आणि जगतानाच्या कडुगोड अनुभवाची शिदोरी संगतीला घेऊन, धाडसाने इथे या अगम्य विषयावर लिहिण्याचे धाडस करीत आहे.
१४०० वर्षे तपश्चर्या करणारा वटेश्वराचा सुत, चांगदेव अंहकाराने ग्रासला, व मीच श्रेष्ठ आहे हे सिध्द करण्याच्या लालसेने ज्ञानेश्वरांना आव्हान करता झाला. कथा सर्वांना माहीत आहेच. कथेच्या तपशीलामध्ये आपणास जाण्याची आवश्यकता नाही, माऊलींनी चांगदेवास उपदेशपर केलेल्या लिखाणात अद्वैत मताचे अतिशय सुलभ आणि बालबोध उदाहरणाद्वारे विवेचन केले आहे. त्या अभंगांमध्ये अद्वैत वेदांत ठासुन भरलेला आहे. प्रत्येक अभंग आपणास द्वैताच्या पल्याड नेण्यासाठी समर्थ आहे. वाचकांनी अवश्य अभ्यासावा असा हा श्लोक संग्रह आहे. त्यातील एक अर्धी ओवी इथे मुद्दाम मांडतो.
तेंवि तूंतें मी गिवसी तेथें तूंपण मीपणेंसी उखते पडे ग्रासीं भेटीचि उरे
उरीभेट, म्हणजे गळाभेट झाल्यास “मी”पण आणि “तु”पण ग्रासले जाऊन गळुन पडते थोड्याशा या आशयाची ही ओवी आहे. उभय म्हणजे दोन, म्हणजेच द्वैत. हे द्वैत जर गळुन पडत असेल तर आपण ही खुशाल समजावे की आपण माउंलीच्या उपदेशाचे पाईक आहोत.
प्रसंग असा होता की आम्ही पुन्हा एकदा सह्याद्रीच्या अप्रतिम अद्वीतीय अवर्णनीय अशा ठिकाणी नुकतेच पदभ्रमण करुन पोहोचणार होतो. तशी ट्रेकींग करताना पायाखालची वाट तुडवत आपण जात असतो. पण यावेळी असे नव्हते. पायाखालची वाट असंख्य अशा नाजुक, लोभस, सुंदर छोट्या छोट्या निसर्गाविष्काराने भरलेली होती. नुसती पायवाटच नाही तर, जिथवर नजर जात होती तिथवर नजाकत निसर्गाच्या प्रत्येक घटकामधुन ओथंबुन वाहात होती. लव लव कणारी गवताची पाती, कधी त्या गवताच्या पात्यांवर अलगद अडकुन पडलेला एकच पाण्याचा थेंब, कधी कधी त्याच गवताच्या पात्यांवर इवलीशी गोगलगायी चिकटुन आणखी उंची गाठण्याच्या यत्नात , कधी एखादा गांडुळ पायवाट मध्ये आडवा पडलेला दिसतो व सरपट तो पायवाटेच्या पलीकडे जाण्याचा प्रयतन करीत असताना दिसतो. कधी पायवाटेच्या बाजुच्या हिरवाईतुन एखादे फुल पायवाटेवर डोके वर काढुन , हसुन आमचे स्वागत करताना दिसते. बर फुल एक  न दोन , असंख्य प्रकारची असंख्य म्हणजे मिजता येणार नाही एवढी फुले, नव्हे नव्हे फुलांचे गालिचेच सर्वदुर पसरलेले. कधीही पाहीले नसतील असे छोटे छोटे बेडुक, मधमाश्या, सापसुरळ्या, सरडे आणि हे सगळे होत असताना, नभातील ढग तरी का नभातच राहतील. नभ देखील उतरले होते. क्षणक्षण धुंदल्या सारखे व्हायचे. पावलापावलावर येथील कळ्या, फुले, पाने, वेली, गवत , प्राणी नव्हे सगळी सृष्टीच एका सुमधुर संगीताच्या तालावर एका लयीत धुंद झाल्यासारखी भासत होती. आता मला सांगा ही वाट काय तुडवायची आहे? नक्कीच नाही. अगदी हळुवारपणे आम्ही एक एक पाऊल आमच्या ध्येयाकडे टाकीत होतो. शेवटच्या वळणावर समोरचा दांड हळु लहान होत होता. एका क्षणी त्या दांडाच्या पलीकडे आकाशाला गवसणी घालणारे एक डोंगराचे टोक दिसु लागले. प्रत्येक पावलागणिक त्या डोंगराची उंची देखील वाढु लागली. आम्ही त्या डोंगराच्या, नव्हे सुळक्याच्या दिशेने त्याच्या जवळ जवळ जात होतो. हा एक किल्ला आहे. लिंगाणा नाव आहे ह्या किल्ल्याचे. जसे जसे आम्ही लिंगाण्याच्या अलीकडच्या पठाराच्या कड्याकडे पोहोचत होतो तस तशी ही धुंदी आणखी वरच्या पातळीवर जात होती. क्षणात वा-याचे झोत येऊन समोरच्या तसेच डाव्या आणि उजव्या बाजुच्या द-यांचे ओघवते दर्शन घडत होते. आणि दुस-याच क्षणात तीच धुंदी पुन्हा सर्व चराचर व्यापुन टाकीत होती. समोर जे काही घडत होते ते सर्व नाट्यमय आणि प्रचंड उर्जा प्रदान करणारे होते. नभ उतरलेले होते, ते म्हणजे नभ आणि सभोवार चिंब ओले झालेले होते, आणि अंग झिम्माड झाले होते रायलिंगाच्या हिरव्या बहरात.
मी जे काही अनुभवत होतो ते स्वर्गीय होते, अलौकीक होते. आम्ही अंदाजे एक ते सव्वा तास रायलिंगावर घालवला. वा-याच्या झोतांसोबत मध्येच ढग नाहीशे होत आणि समोर, पश्चिमेकडे बा रायगडावरील जगदीश्वराच्या प्रासादाची गगनचुंबी शिखरे दिसत. अजुन उजवी कडे पाहिल्यावर सह्यगिरीची असंख्य शिखरे, आकाशात झेपावताना दिसत, त्यामध्ये प्रकर्षाने दिसले ते कोकणदिवा, रायलिंग माची. लिंगाणाच्या कधी डावीकडुन ढगांचे लोट येत तर कधी उजवीकडुन व अर्धा अधिक लिंगाणा, शिखर सोडुन, ढगात जाई. व लिंगाण्याचे शिखर म्हणजे टोक मात्र तसेच अधांतरी तंरगताना दिसे. हे दृश्य काही फार लांब नव्हते. एक दोन पावले पुढे जाऊन लिंगाण्या च्या टोकाला हात लागेल की काय इतका जवळ होता लिंगाणा आमच्या समोर.
कॅम्पसाईटवर माघारी वेळेत, अंधारण्यापुर्वी जाणे गरजेचे होते. आमच्यापैकी अनेकांना तर इथुन माघारी जाण्याची इच्छाच होईना, अगदी मला ही. कित्येकांनी मला परतीच्या प्रवासात विचारले की आपण रायलिंग पठारावरच टेंट लाऊन मुक्काम का करीत नाही. त्यांना समजावुन सांगावे लागले की, मुक्कामामुळे आपण निसर्गातील “त्या” सौहार्दामध्ये (धुंदी मध्ये) व्यत्यय निर्माण करण्याचा धोका जास्त आहे. मंडळींना हा विचार पटला देखील व आवडला देखील.
कॅम्पसाईटकडे परतताना, त्या धुंदीचा, नभाचा, झिमाड अंगाचा आणि हिरवाईचा  विचार डोक्यात डोक्यात आला. माझ्यासाठी माझ्या सोईने मी या सा-या विचारांना एका सुत्रात बाधण्याचा प्रयत्न करु लागलो.
हा हिरवा बहर खरच इतका मोहीत करतो की इथे आल्यावर माझे अंग झिम्माड होते म्हणजे माझे मीपण गळुन पडते. माझ्यातील देहबोध नाहीसा होत जातो. व मी एक आणखी उच्च अशा अनुभुतीच्या पातळीवर जातो जिथे द्वैत राहत नाही. माझ्यातील मी एका खुप मोठ्या प्रवासास निघतो. तो दृश्य अदृश्य अशा अनेक वस्तुंना स्वतमध्ये सामावुन घ्यायला सुरुवात करतो. माझ्यातील मी मोठा व्हायला सुरुवात झालेली असते. समोर दिसणा-याअ सर्व चल अचल चराचरास तो सामावुन घ्यायला सुरवात करतो. आधी मला अनुभुती होते की हे ह सभोवातीदिसणा-या निखळ सुंदर अशा निसर्गाच्या मधुन पावले टाकत टाकत चालणारा हा देह, हे शरीर म्हणजे मी आहे, नतर, ती लवलवणारी गवताची पाती म्हणजे “मी” आहे अशी अनुभुती होऊ लागते, नंतर ती पान, फुल, फुलपाखर, प्राणी, हवा पाणी, ढग, ढगांमधील तुषारविंदु, डोंगर, द-या, दगड हे सगळे एकसंध, एकजीव एकात्म असल्याची अनुभुती होते.
आणि हा एकात्मभाव जेव्हा अनुभवास येतो तेव्हा “मी” पण संपते. आणि मग ती धुंदी, एकतानता, सौहार्द अनुभवास येते. या अनुभुतीच्या उच्च पातळीवर मी नसतो. तिथे तु नसतो. तिथे “असणे” च नसते. आणि “नसणे” देखील नसते.  तिथे असते फक्त सौहार्द, सामंजस्य. हे सामंजस्य उस्फुर्त, निसर्गदत्त असते. ओढुन ताणुन आणलेले नसते. आणि जिथे असे सौहार्द असेल तिथे अपाय होईलच कसा? आणि म्हणुनच आमच्याकडुन पायाखालची वाट तुडवली गेली नाही. आम्ही स्वतच वाट झालो होतो. लिंगाण्याला मिठी मारुन आलेले ढंगामधील तुषार आमच्या रंध्रा रंध्रात अविरत आरपार जात होते, बाहेर येत होते. “मी” राहीलोच नाही. फक्त निसर्ग होता. फक्त निसर्ग.
तेंवि तूंतें मी गिवसी तेथें तूंपण मीपणेंसी उखते पडे ग्रासीं भेटीचि उरे
माऊलींनी यापेक्षा आणखी वेगळा उपदेश केलाय असे मला तरी वाटत नाहीये. दैनंदीन जीवनात ह्या एकात्मभावाचा अनुभव घेता येणे शक्य आहे का? दैनंदीन जीवनात अनुभुतीच्या अशा उच्च पातळीवर आपणास जाता येईल का? दररोज माझे ज्या व्यक्तिशी व्यवहार (बोलणे चालणे देणे घेणे)  होतात काय ती व्यक्ति निसर्गाचा घटक नाहीये का? मी देखील निसर्ग आहे व ती व्यक्तिदेखील निसर्ग आहे. आम्हा दोघांमधील दोघेपण लोप पावुन एकपण जर आले, तादात्म्य जर आले, सौहार्द जर आले तर कुणासही अपाय कसा होईल? प्रेमी(म्हणजे प्रेम करणारा किंवा करणारी) आणि प्रेमास्पद (ज्या व्यक्तिवर प्रेम करतो ती व्यक्ति) या दोघांमध्ये अभेद निर्माण होणे, एकात्म भाव निर्माण होणे म्हणजे खरी प्रेमाची फलशॄती होय. अध्यात्म यापेक्षा वेगळे ते काय आहे. लौकीकात ज्या प्रेम हा शब्द वापरला जातो, तो अर्थ जरी गृहीत धरला तरी आज प्रत्येक स्वतःच “मी” आपल्या प्रेमास्पदाच्या “तु” मध्ये विलीन करुन, स्वतःच “मी” मोठा करण्याची संधी आहे. व हा मी उत्तरोत्तर वृध्दींगत होऊन त्याने समष्टीमध्ये विलीन झाले पाहीजे, त्यानंतर सृष्टी , नंतर परमेष्टी मध्ये रुपांतरीत झाले पाहीजे. थोडक्यात काय तर प्रेम म्हणजे प्रेम असत वाल प्रेम ही अध्यात्माची पहीली व शेवटची पायरी आहे. व सगळा प्रवास होतो निसर्गामधुन. आपणास फक्त एकच भान ठेवायचे असते, ते म्हणजे पायाखालची वाट तुडवायची नाही. अलगद, हळुवार, मृदुल पावले टाकीत आपल्या सहचरांची काळजी घेत त्या गगनचुंबी ध्येयावरील नजर न हलवता  , धुंद होऊन मार्गक्रमण करीत राहायचे असते.
हेमंत ववले,
निसर्गशाळा, पुणे

(टिप - आमच्या या स्वर्गीय सहलीची शब्दसफर आवडली असेल तर अवश्य फोटोसफर खालील लिंकवर क्लिक करुन करा. फोटोग्राफी – यशदीप माळवदे )